सागरिका ठाकूर

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

लेखिका मंदा बोडस यांच्या सांस्कृतिक विषयांवर आधारित तसेच निव्वळ बालसाहित्य नाही तर तरुणांच्या अंगाने लिहिणाऱ्या या लेखिकेच्या ‘बिरबल’ या पुस्तकातून १५५६ ते १५६२ या काळातील विचारसरणी काय असेल हे यातून जाणवते. त्या काळातील हिंदी भाषा आत्ता कोठेच पाहायला व वाचायला मिळणार नाही. मला विशेषत: ‘हिस्टोरिकल फिगर’बद्दल कुतूहल आहे. हिंदी भाषेची व संस्कृचीही मला आवड आहे. मी एक तरुण मुलगी म्हणून या काळातील फास्ट जगाची साक्षीदार आहे. कारण त्यातून नवीन पिढीची मानसिकता कळते. जिथे आपण एखादी कृती करण्याआधी फारसा विचार करत नाही प्रथम ती कृती चुकते. एकदा घडलेली गोष्ट आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द आपण परत घेऊ  शकत नाही. या पुस्तकात असेच काही ‘एपिसोडिक’ धडे (चॅपटर्स) आहेत. त्यात काही काल्पनिक कथा सांगितल्या आहेत. ज्यात हिस्टोरिकल फिगर्स म्हणजे त्या काळातील राजांच्या तरुणपणीच्या काही कथा आहेत. ही ओळ वाचताना हेच जाणवते की त्या काळातही ही माणसे आपल्या जीवनशैलीत एक शिस्त पाळत होती. एकच विचार शंभर वेळा चौकसपणे करण्याची पद्धत होती. योद्धा लढायला जात असेल तर शत्रूला हरवण्यासाठी मानसिकरीत्या तो किती मोठय़ा प्रमाणावर तयारी करत असेल? किंवा राजा दरबारात कोणतेही निर्णय प्रजेसाठी घेण्याआधी किती वेळा विचार करत असेल? त्यातून काय कृती करायची व त्याचा पुढे परिणाम कसा होईल याची जाणीव ठेवून सगळे निष्ठेने करायचे. त्या काळी राजेपदाची जबाबदारी त्यांच्यावर तरुणपणीच यायची. मग एक तरुण शिलेदार म्हणून तशी अचूक निर्णयांतर्गत कृती करणं किती आव्हानात्मक होतं, त्यातून त्यांच्या घरातच बाहेरच्यांपेक्षा जास्त शत्रू होते, त्यांचे डावपेच वेगळेच. आत्ताची पिढी कोणतीही कृती करताना विचार करते का? किती वेळा आपण इतरांना उलटून बोलताना विचार करतो? एखादी व्यक्ती चूक करते आणि नंतर ती चूक लपवण्याचा प्रयत्न करते. झालेल्या चुका आपण बदलू शकत नाही, त्याच चुका आयुष्यभर आपल्याला खात राहतात. म्हणून आज तरुणांनी आपल्या करिअरपेक्षाही जास्त समाजात वावरताना, घरात एकत्र नांदताना कोणतीही कृती किंवा आपण जे वागतोय, बोलतोय ते योग्य का अयोग्य ते पाहायलाच हवे. तरच आपली नाती टिकतील, मैत्रीत समाधान मिळेल. पुढे आपल्या चुकीमुळे स्वत:ला व इतरांना होणारा त्रास टाळण्यासाठी तरुणांनी स्वत:ला तसं तयार करायला हवं. आजकाल तरुण पिढी इतरांना उपदेश किंवा सल्ले देताना दिसते पण इतरांना सूचना देण्यापेक्षा स्वत:ला काही सूचना द्यायला हव्यात. वरच्या ओळीतून हाच भावार्थ प्रकट होतो.

viva@expressindia.com