गेल्या पाच महिन्यात अंजनगावसुर्जी तालुक्यामधून विद्यार्थी, पदवीधर पोलीस पाटील, सधन शेतकरी आणि एक गृहिणी बेपत्ता झाली आहे. या चौघांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याने या चार कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अंजनगावसुर्जी तालुक्यातील हुसेनपूर खोडगाव येथील प्रभा दादाराव ताडे ही चाळीस वर्षांची गृहिणी ३ ऑगस्टपासून तर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, शेकापूर पोही येथील पोलीस पाटील रामदास ज्ञानदेव मानकर (५५) हे गेल्या २२ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे.
वनोजा येथील गजानन रामदास चिंचोळकर हे पन्नास वर्षांचे शेतकरी १४ जानेवारीपासून बेपत्ता आहे, तर अंजनगावसुर्जी येथील सुशांत अनिल बोडखे हा विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून अकोला येथून बेपत्ता झाला आहे.
या साऱ्यांच्या चिंतित कुटुंबीयांनी अंजनगाव, रहिमापूर चिंचोली व सिव्हील लाईन्स अकोला पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती व अकोला यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
अंजनगावसुर्जी तालुक्यातील चौघे अद्यापही बेपत्ताच
गेल्या पाच महिन्यात अंजनगावसुर्जी तालुक्यामधून विद्यार्थी, पदवीधर पोलीस पाटील, सधन शेतकरी आणि एक गृहिणी बेपत्ता झाली आहे. या चौघांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याने या चार कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
First published on: 14-02-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four peoples are missing from anjangoansurji distrect