शहरावर जलसंकट कोसळले असतानाच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात (पाणी गिरणी) जलवाहिनी फुटून लाखो लिटर्स पाणी वाया जात असल्याने व त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त तरूणांच्या जमावाने पाणी गिरणीवर हल्लाबोल केला होता. यात कार्यालयातील मोडतोड झाली होती. याप्रकरणी अज्ञात १५ते २० अज्ञात व्यक्तींविरूध्द अखेर पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पालिकेचे कर्मचारी रवींद्र महादेव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ते २० अज्ञात व्यक्तींच्या जमावाने पाणी गिरणीत अनाधिकाराने घुसून रासायनिक प्रयोगशाळेसह स्टोअर रूमच्या काचा फोडल्या. तसेच दूरध्वनी यंत्रणा तोडली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
पाणी गिरणी हल्लाबोलप्रकरणी जमावाविरूध्द गुन्हा दाखल
शहरावर जलसंकट कोसळले असतानाच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात (पाणी गिरणी) जलवाहिनी फुटून लाखो लिटर्स पाणी वाया जात असल्याने व त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त तरूणांच्या जमावाने पाणी गिरणीवर हल्लाबोल केला होता. यात कार्यालयातील मोडतोड झाली होती. याप्रकरणी अज्ञात १५ते २० अज्ञात व्यक्तींविरूध्द अखेर पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
First published on: 05-01-2013 at 08:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered on mob for attack on water mill in solapur