मुंबईच्या वातावरणाला सरावलेले, इथलेच होऊन राहिलेले महाकाय पर्जन्यवृक्ष वसंतात एकीकडे बहरत असताना काही वृक्ष मात्र मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे. दादर, माटुंगा, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ येथील रस्त्यांवर छाया देत उभ्या असलेल्या या वृक्षांना गेल्या वर्षी लागलेली कीड पावसाळ्यानंतर कमी झाल्याने वृक्षप्रेमींना दिलासा वाटत होता. मात्र ती केवळ मरणापूर्वीची धडपड असल्याचे आता लक्षात येत आहे.
शंभर मीटरहून अधिक घेर असणाऱ्या या वृक्षांना बहर येण्यास आता सुरुवात झाली आहे. गुलाबी, नाजुक पाकळ्यांची फुले मिरवणारी ही झाडे मुंबईच्या हरेक रस्त्यावर सोनमोहराच्या वृक्षाला साथ देत उभी आहेत. अनेक पक्षी या वृक्षांवर विसाव्याला आलेले दिसतात. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात तर महाकाय वृक्षाच्या अंगाखांद्यांवर वटवाघळांची भलीमोठी वस्तीच तयार झाली आहे. अशा या वृक्षांपकी काहींना गेल्या वर्षी कीड लागली. झाड सुकू लागले. फांद्यांवर पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसू लागला. झाडांना कीड लागल्याची माहिती मिळाल्यावर वृक्षतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लट्ट यांनी स्वत: जाऊन पाहणी केली. ही कीड नेमकी कशी लागली किंवा त्यावर काय उपाय करायचे याबाबत ठोस कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांकडे नाही, असे डॉ. लट्ट यांनी सांगितले.
या झाडावर कीडप्रतिबंधक उपाय करण्यात आले. मात्र या झाडावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास त्याचा त्रास आजूबाजूच्यांना होण्याची शक्यता होती. मग अग्निशमन दलाच्या गाडय़ांमधून पाण्याच्या फवाऱ्याने कीड धुवून काढण्याचा निर्णय झाला. मात्र सुदैवाने गेल्या वर्षी जून-जुलमध्ये जोरदार पाऊस पडल्याने नसíगकरीत्या झाडे वाचली. त्यांना पालवीही फुटली होती, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त एस. एस. िशदे यांनी दिली.
या विभागाचे नगरसेवक अनिल ित्रबककर यांनी या वृक्षांचा मुद्दा गेल्या वर्षी पालिका मुख्यालयापर्यंत नेला होता. झाडांची समस्या अजूनही कायम असून फांदी अंगावर पडल्यास गंभीर दुखापत होईल, अशा तक्रारी घेऊन रहिवासी येत आहेत, असे ित्रबककर यांनी सांगितले.
पर्जन्य वृक्ष म्हणजे काय?
या झाडाच्या पानांवर पावसाचे पाणी साठते. सायंकाळी या झाडाची पाने मिटतात व त्या वेळी त्या पाण्याचा शिडकावा पडतो. त्यामुळेच या झाडाला पर्जन्यवृक्ष म्हणतात. विदेशातून साधारण ५० च्या दशकात आणलेल्या या वृक्षाने इथे चांगलाचा जम बसवला. मात्र त्याचे आयुष्य साधारण साठ-सत्तर वर्षांचे मानले तर ते आता मृत्युपंथाला लागले असावेत, असा कयास महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी मांडला.
डॉ. चंद्रकांत लट्ट यांच्या पाहणीतील निष्कर्ष
सांताक्रूझ पूर्वेला रेल्वे स्थानकापासून फ्लायओव्हपर्यंत ३८ पकी १५ वृक्ष व्यवस्थित होते. तीन वृक्षांना पुन्हा पालवी फुटली. सात हळूहळू पूर्वपरिस्थितीत येत होते, ११ वृक्षांची परिस्थिती नाजूक होती तर दोन वृक्ष अगदीच अत्यवस्थ होते.
वांद्रे कुर्ला संकुलातील आयकर भवनापासून कलानगरच्या मुख्य द्वारापर्यंत ८० वृक्षांपकी २० सुदृढ होते, ११ पुन्हा डेरेदार होऊ लागले होते. नऊ वृक्षांना पालवी फुटण्याचा वेग कमी होता, ११ वृक्ष त्यापेक्षाही कूर्मगतीने बरे होत होते तर २९ वृक्ष मात्र निष्पर्ण होते.
रुईया महाविद्यालय ते दादर पूर्व स्थानक रस्त्यावर ६० झाडांपकी २१ सुदृढ होती, २५ झाडांना नव्याने पालवी येत होती, आठ झाडे हळूहळू पूर्वपदावर येत होती, सहा मात्र निष्पर्ण झाली होती.
मुंबईत झाडांच्या संख्येनुसार पर्जन्यवृक्षाचा १४ वा क्रमांक लागतो. सरकारी ७१९२, खासगी ८६७१, उद्योग ७८८, उद्यान ८१७, रस्ता ११८५६, इतर ठिकाणी २८८५ असे एकूण ३२२०९ पर्जन्यवृक्ष मुंबईत आहेत.
पांगारा – २००८ मध्ये महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत शहरात ४७४६ झाडे आढळून आली होती. पांगाऱ्याचे लाकूड हलके व त्यामानाने मजबूत असल्याने जोरदार वाऱ्यातही हा वृक्ष टिकून राहतो. खाऱ्या वाऱ्यात हा वृक्ष चांगला वाढत असल्याने मुंबईत पांगारा अनेक ठिकाणी फुलत होता. मात्र साधारण नऊ वर्षांपूर्वी पांगाऱ्यावर कीटकांचा हल्ला झाला. या संसर्गामुळे पांगाऱ्याची पाने चुरमडून गाठी झाल्यासारखी दिसायला लागली. या संसर्गामुळे पांगाऱ्याचा फुलोरा आटला. लवकरच हे झाड मुंबईतून हद्दपार होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2014 रोजी प्रकाशित
पर्जन्यवृक्ष मरणपंथाला लागले!
मुंबईच्या वातावरणाला सरावलेले, इथलेच होऊन राहिलेले महाकाय पर्जन्यवृक्ष वसंतात एकीकडे बहरत असताना काही वृक्ष मात्र मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे.

First published on: 25-03-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day by day quantity of rainy tress going less