लातूर शहरात सध्या पाणीटंचाई असल्याने नागरिकांनी कोरडे रंग वापरून व पाण्याचा कमीत कमी वापर करून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन महापौर स्मिता खानापुरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. रविवारी रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
सध्या पाणीटंचाई असल्याने नगरिकांनी कोरडे रंग वापरून रंगपंचमी साजरी करावी. कोरडय़ा रंगांचा वापर केल्याने अंगावरील रंग काढण्यासाठी, रंगाचे कपडे धुण्यासाठी पाण्याचा कमीत कमी वापर होतो. उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापौर खानापुरे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘पाणीटंचाईमुळे रंगपंचमीला कोरडय़ा रंगांचा वापर व्हावा’
लातूर शहरात सध्या पाणीटंचाई असल्याने नागरिकांनी कोरडे रंग वापरून व पाण्याचा कमीत कमी वापर करून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन महापौर स्मिता खानापुरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. रविवारी रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

First published on: 30-03-2013 at 03:05 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry colour can be used on rangpanchmi due to water shortage