लातूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊ नये तसेच नव्याने चच्रेत असलेले नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या उमेदवारीऐवजी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या, असे साकडे लातुरातील दहा इच्छुक काँग्रेसच्या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे घातले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी लातुरात आले होते. लातूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक दहा उमेदवारांनी लेखी निवेदन प्रदेशाध्यक्षांना दिले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती बालाजी कांबळे, सुनीता आरळीकर, मोहन माने, अॅड. संभाजीराव बोडके आदींचा समावेश आहे.
ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात ३२ वर्षांनंतर लातूर लोकसभा राखीव मतदारसंघाची निर्मिती झाली. २००९ साली स्थानिक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केलेला होता, पण पक्षश्रेष्ठींनी बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे जेमतेम ६ हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. जिल्हय़ातील मागासवर्गीय कार्यकत्रे काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने करत असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास आपला उमेदवार अधिक मतांनी निवडून येईल. मागील साडेचार वर्षांतील कामाबद्दल जनमताचा कानोसा घेतल्यास बाहेरच्या उमेदवाराबद्दल सामान्य जनतेत नाराजी दिसून येत आहे. स्थानिक उमेदवारास प्राधान्य दिल्यास कार्यकर्त्यांत चतन्य निर्माण होईल व सर्वसामान्य लातूर मतदारसंघातील जनतेचा सन्मान राखला जाईल. त्यादृष्टीने पक्षश्रेष्ठींनी निर्णय करावा व स्थानिकांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे विद्यमान खासदार जयवंत आवळे व इच्छुक डॉ. नरेंद्र जाधव या दोघांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे संकेत आहेत.