आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगणक तज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाबाबत चर्चा व्हावी या उद्देशाने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र आणि इतर संस्थांच्या वतीने ‘लोकसंवाद’ उपक्रमातंर्गत ‘कॉम्प्युटर युगातील मराठी भाषा’ या विषयावर समूह चर्चेचे आयोजन सिलिकॉन व्हॅली येथे करण्यात आले होते. या वेळी खांडबहाले यांनी आपले मत व्यक्त केले. संगणकतज्ज्ञ अनुराग केंगे यांनी, इंटरनेटवर उपलब्ध असणारी वृत्तपत्रे, ब्लॉग यांतून विचारस्वातंत्र्याला लोकजागृतीचे परिमाण लाभले आहे आणि मराठी व संगणक साक्षरतेच्या ते भल्याचे आहे, असे नमूद केले. बोलीभाषेतील शब्दांचा जास्तीत जास्त वापर भाषेच्या विकासासाठी पूरक असतो असेही ते म्हणाले. पत्रकार प्रियंका डहाळे यांनी व्यवहारात इंग्रजी व मराठीची सरमिसळ करण्यापेक्षा दोन्ही भाषांचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करून नव्या लेखकांचे लेखन वाचावे, असा सल्ला दिला. साहित्यिक नंदन रहाणे यांनी मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड काढून टाकणे गरजेचे असून अस्मिता आणि अस्तित्व भाषेशी निगडित गोष्टी असल्याचे सांगितले. संगणकतज्ज्ञ प्रमोद गायकवाड यांनी मराठीची जपणूक करण्यासाठी ई-बुक्ससारखी वाचन संस्कृती जगण्याचा परिघ वाढवणारी आहेत. समाजात संगणकाविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी मराठी प्रतिशब्दांचा वापर करावा, असे सांगितले. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ऊर्जा पाटील यांनी केले.

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…