शिक्षकांच्या एकीच्या ताकदीवरच आम्ही अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. चिंतामुक्त शिक्षकच वर्गात विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन करू शकतो, असे प्रतिपादन माजी आ. शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांनी केले.
शाहू स्मारक येथील प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेमध्ये ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दामोदर सुतार होते.
पाटील म्हणाले, चिंतामुक्त शिक्षक चांगल्याप्रकारे शिकवू शकतो. त्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाची जबाबदारी कमी करायला हवी. खासगी शाळांचे पेव गावागावात फुटले आहे. आता खासगी शाळांच्या विरोधात आवाज उठवायला हवा.
शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे म्हणले, शिवाजीराव पाटील आणि संभाजीराव थोरात हे दोन शिक्षक नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास आता विलंब लागणार नाही.
स्वागत नामदेराव रेपे यांनी केले. ग. चि. ठोंबरे, एन. वाय. पाटील, एस. डी. पाटील यांची भाषणे झाली. दिलीप बच्चे, बा. म. पटेल, पी. के. पाटील, रवींद्र नाष्टीवे, अँड राजेंद्र वाईंगनकर, प्रा.अशोक पाटील, बी. एच. पाटील, संभाजी कदम यांच्यासह शिक्षक बँकेचे सर्व संचालक, शिक्षक यांनी हजेरी लावली होती.