जिल्ह्य़ात दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलेल्या पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी वाढू लागली आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
दरम्यान, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ज्या गावांना पाणीपुरवठा होतो, त्या ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नाही. जिल्ह्य़ातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ३४ लाख ५१ हजाराच्या निधीची मागणी जीवन प्राधिकरणने केली. सिद्धेश्वर योजनेच्या दुरुस्तीसाठी १० लाखांच्या निधीस जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. चार प्रादेशिक योजनांमधून ज्या गावांना पाणीपुरवठा होत नाही, त्या गावांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्य़ात मंजूर १४४ विंधनविहिरींपैकी १०२ विहिरींचे काम पूर्ण झाले. ८५ विहिरींना पाणी लागल्याची नोंद आहे. भारत निर्माण व जलस्वराज्य अंतर्गत २८ गावांतील नळयोजना दुरुस्तीला ४४ लाख ६६ हजारांच्या निधीखर्चाला मंजुरी मिळाली. आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेवर २ कोटी ३४ लाखांचा खर्च झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2013 रोजी प्रकाशित
हिंगोलीमध्ये टँकरची मागणी वाढू लागलीं
जिल्ह्य़ात दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलेल्या पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी वाढू लागली आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरम्यान, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ज्या गावांना पाणीपुरवठा होतो, त्या ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नाही.
First published on: 17-04-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker demand increase in hingoli