डॉ. सारिका सातव
आपल्या देशात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत हे सहा ऋतू आहेत. या ऋतूंमध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यांची विभागणी होते. वातावरणात जसा ऋतूप्रमाणे बदल होतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होत जातो. शरीर आणि वातावरणातील बदलाला अनुसरून आपण आपल्या आहारविहारातही बदल केला पाहिजे. एकच प्रकारचा आहारविहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही म्हणून बदल आवश्यकच असतो.

आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!

amazon primeday sale
‘Amazon Prime Day Sale’ नक्की काय असतो? ग्राहकांना वस्तूंवर मिळणारी सूट खरी असते का?
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
these five things should keep in your car in monsoon
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? मग गाडीमध्ये ‘या’ पाच गोष्टी असायलाच हव्यात! पाहा यादी
benefits of watermelon juice
दररोज टरबुजाचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Instantly make fluffy coffee at home during monsoons
पावसाळ्यात घरीच झटपट बनवा फ्लफी कॉफी; नोट करा साहित्य आणि कृती…
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता

ऋतूनुसार आहारविहारात बदल न केल्यास आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजेच कफ, वात आणि पित्त यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे अनेक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. वाताचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो. त्याचप्रमाणे पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत, तर कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असतो. ऋतूनुसार योग्य आहार घेतल्यानं आपण त्या-त्या ऋतूंमध्ये प्रकोप होणाऱ्या त्रिदोषांना आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधींना तर दूर ठेवू शकतोच, शिवाय योग्य आहार आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असतो. एकंदरच निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ऋतूनुसार आहारविहारात बदल करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

हिवाळ्यातील आहाराच्या वेळा

सध्या थंडी जाणवू लागली आहे. तापमान कमी झाल्याने दिवसाही वातावरणात गारवा जाणवतोय. या ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो. या ऋतूमध्ये आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे हे समजावून घेऊ. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते म्हणून या ऋतूमध्ये आपण जो आहार घेऊ त्यामध्ये अधिक ऊर्जा असणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण लवकर घ्यावे, तसेच रात्री झोपताना दूध जरूर घ्यावे.

आणखी वाचा : उपयुक्त : साडीवरचा पेटिकोट… क्षुल्लक नाही, फार महत्त्वाचा

रात्र मोठी असल्याने सकाळी लवकर (सकाळी ७ ते ८.३० पर्यंत) नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्याला शक्यतो उशीर करू नये किंवा नाश्ता करणे टाळू नये. काही कारणास्तव उशीर होणार असेल तर सुकामेवा- उदा. बदाम, अक्रोड आदी सकाळी उठल्यावर खायला हरकत नाही. सकाळीही दूध लवकर प्यावे.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

शरद ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली असते. भूक चांगली लागते आणि पचनही चांगले होते. त्यामुळे दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका तसेच एका वेळी खूप जेवू नका. दिवसभरातल्या जेवणांमध्ये सकाळची न्याहारी जास्त चांगली असावी. दोन जेवणांमध्ये जास्त अंतर राहिल्यास आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूमध्ये सकाळचा नाश्ता लवकरच घ्यावा. अन्यथा सकाळची उपाशीपोटीची साखर कमी होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप – पप्पांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय…

ज्यांचे वजन खूपच कमी आहे, लहान मुले, जे अंगमेहनतीची कामे जास्त करतात आणि गर्भवती स्त्रिया यांनी तर सकाळच्या न्याहारीला खूप महत्त्व दिले पाहिजे. न्याहारी सकाळी ७ ते ८.३० पर्यंत, दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण, सायंकाळी ४ ते ५ दरम्यान हलका नाश्ता आणि रात्री ८ ते ९ दरम्यान रात्रीचे जेवण अशा वेळा शक्यतो पाळाव्यात.
dr.sarikasatav@rediffmail.com