गेल्या काही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे मनोबल खालावलेले असेल; पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, असे मत भारताचे माजी यष्टिरक्षक आणि माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये गुणवत्तेबरोबरच दैवही तुमच्या बाजूने असावे लागते. भारत-पाकिस्तान हा साखळीतील पहिला सामना दोन्ही देशांबरोबरच क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकल्यावर भारताचे मनोबल उंचावेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुन्हा त्यांच्यामध्ये आक्रमकपणा दिसेल,’’ असे मोरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘विश्वचषकामध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. प्रत्येक सामन्यागणिक समीकरणे बदलतात. विजयामुळे आत्मविश्वास वाढतो. विश्वचषकातील एखादा विजय प्रेरणादायी ठरू शकतो.’’
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तानला पराभूत केल्यावर भारताचा आत्मविश्वास वाढेल – किरण मोरे
गेल्या काही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे मनोबल खालावलेले असेल; पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल,
First published on: 11-02-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India confidence increased after defeated pakistan says kiran more