भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.
भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.Read More
मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डिलायटिस आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांनी ग्रस्त लष्कर व नौदलाच्या कर्मचाऱ्यांना अपंगत्व निवृत्ती वेतन मंजूर करण्याचा मुंबईस्थित सशस्त्र…
Indian Navy Helicopters: कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्यासाठी अमेरिकेने आखलेल्या ऑपरेशन नेपच्युनमध्ये सहभागी हेलिकॉप्टरची अत्याधुनिक आवृत्ती आता…
भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे नौदल त्यांच्या बंदरातच रोखले; भविष्यातील युद्धात माहितीप्रभुत्व, स्वायत्त तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर नौदल महत्त्वाचे ठरेल, असे…
Pakistan China submarine deal हिंदी महासागराच्या उत्तरेकडील सामरिक क्षेत्रांमध्ये भारतीय नौदलाने आपला प्रभाव वाढवला आहे. परंतु, आता पाकिस्तानला त्यांची समुद्री…