Marriage Astrology : माणूस त्याच्या आयुष्यात नात्यांना सर्वात जास्त महत्त्व देतो पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही नाते फार काळ टिकत नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. एखादा व्यक्ती आयुष्यभर आपल्याबरोबर असावा, ही साधी अपेक्षा असते पण काही लोकांचे नाते फार काळ टिकत नाही त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात.
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा आहे. त्यात प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही गुण असतात. अशात काही लोकांना नाते टिकवणे हे कठीण जाते. आज आपण अशाच काही राशींच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना नाते टिकवताना अडचणी येतात.

कुंभ राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, नात्याच्या बाबतीत कुंभ ही रास सर्वात जास्त अस्थिर असते. या राशीचे लोक स्वभावाने मनमोकळे असतात. त्यांचे मन इच्छेनुसार बदलत असते. त्याचबरोबर ते स्वत: बोललेल्या गोष्टीवर ठाम राहत नाही आणि स्वत: दिलेले वचन पाळत नाही. हे स्वभावाने चांगले असतात. हे लोकं कोणाविषयी वाईट बोलत नाही. फक्त स्वत:च्या कामावर लक्ष देतात. वैवाहित नात्यात गे लोक जास्त विश्वास ठेवत नाही. याच कारणामुळे यांचे नाते फार काळ टिकत नाही. जोडीदाराला वेळ देण्याऐवजी ते अनेकदा आपल्याच विचारात मग्न असतात.

हेही वाचा : Budh-Guru Yuti : १२ वर्षानंतर मेष राशीमध्ये असेल दोन शुभ ग्रह, ‘या’ चार राशींचे नशीब चमकेल, मिळणार अपार धन

सिंह राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीचे लोक खूप स्वार्थी असतात. हे लोक आपल्या जवळच्या आणि कुटूंबातील लोकांवर तेव्हाच लक्ष देतात जेव्हा त्यांना त्यांच्यापासून मोबदला मिळतो. ज्या कामात त्यांना फायदा होतो, ते त्याच गोष्टींना वेळ देतात.सिंह राशीमध्ये प्रामाणिकपणा कमी असतो. नात्यात आणि कामामध्ये अनेकदा प्रामाणिकपणा दिसत नाही. याच स्वभावामुळे या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही. लग्नानंतर अशा लोकांना अनेक अडचणी येऊ शकतात.

तुळ राशी

तुळ राशीचे लोक कोणावर सुद्धा लगेच विश्वास ठेवत नाही. या लोकांमध्ये आत्मसमर्पणाची भावना असते. जे लोक त्यांना आवडतात, त्यांच्यासाठी ते वाट्टेल ते करतात पण जोडीदारावर अविश्वास दाखवण्याच्या स्वभावामुळे त्यांचे नाते फार काळ टिकत नाही. या राशीच्या लोकांपासून प्रामाणिकपणाची अपेक्षा केली जात नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)