Shani-Budh Make Navpancham Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. दिवाळीच्या सहा दिवसानंतर बुध आणि शनी ग्रह एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून त्रिकोण भावात असतात तेव्हा नवपंचम राजयोग निर्माण होतो. बुध शनीपासून पाचव्या शनी बुध ग्रहापासून नवव्या भावात असेल. हा योग २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजून ४४ मिनिटांनी निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

नवपंचम राजयोग करणार ‘या’ राशींना मालामाल

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.

कन्या (Kanya Rashi)

हा शुभ राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)