तरतुदींमुळे संच स्वस्त होण्यास मदत ; रोजगारनिर्मितीसही

What is STT levied on stock market transactions
शेअर बाजारातील व्यवहारांवर आकारला जाणारा ‘एसटीटी’ काय आहे? अर्थसंकल्पात त्यातील वाढ भांडवल बाजारासाठी निराशाजनक कशी?
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
CNG bike, freedom 125, Bajaj auto, two wheeler
विश्लेषण : जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात… प्रवासी वाहतूक क्षेत्रात स्थित्यंतर घडविणार?
corn, Scarcity, Poultry Business,
देशात मक्याचा खडखडाट, प्रतिकिलो ३० रुपयांवर; कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम
thane kalyan ring road project marathi news
कल्याण रिंग रोड पूर्णत्वाकडे, प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण; एमएमआरडीए मुख्यालयात पार पडली बैठक
MHADA, MHADA Plans Rs 1200 Crore Revenue from Kamathipura Redevelopment, Kamathipura Redevelopment, Kamathipura Redevelopment Await State Approval, mumbai news, marathi news, loksatta news,
कामाठीपुरा पुनर्विकासातील अधिमूल्याचा पर्याय, म्हाडाला १२०० कोटी?
Barcelona Protest against tourists Why are people squirting water on tourists in Barcelona
‘पर्यटकांनो, घरी जा!’ बार्सिलोनामधील स्थानिक लोक पर्यटकांवर पाण्याचे फवारे का मारत आहेत?

मुंबई: सौरऊर्जा प्रकल्पांच्या संचांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने सौरऊर्जा संचांमधील घटकांच्या आयातीमधील भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगारनिर्मिती वाढून सौरऊर्जा संच स्वस्त होण्यास मदत होणार आहे.

सध्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या संचातील पॅनलमधील सेल हे सुमारे ९५ टक्के चीनमधून भारतात आयात होतात. अत्यंत मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्याशिवाय स्थानिक पातळीवर त्यांचे उत्पादन परवडत नाही. आता केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यामुळे भारतातही मोठ्या प्रमाणात सेलचे उत्पादन करणे शक्य होईल. सध्या सेल उत्पादनाची भारतातील क्षमता ३ हजार मेगावॉट असून केंद्र सरकारच्या प्रोत्साहन अनुदान योजनेमुळे ती क्षमता वर्षभरात तिप्पट होऊन ९ हजार मेगावॉटचे सेल भारतात तयार होतील, असा अंदाज आहे, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले. याशिवाय सौरऊर्जेचे पनल हे ८० टक्के चीन, थायलंड, व्हिएतनाममधून आयात होतात. १ एप्रिलपासून पॅनलवर ४० टक्के तर सेलवर २५ टक्के आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातील उत्पादनाला प्रोत्साहन मिळून सौरऊर्जा संचातील विविध भाग तयार करण्यात भारत आत्मनिर्भर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच चीनवरील अवलंबित्व कमी होण्यास सुरुवात होईल. परिणामी पुढील काळात सौरऊर्जेचा दर कमी होण्यास मदत होईल, अशी पुस्तीही वित्तमंत्र्यांनी जोडली.

हरितकेंद्री…

’कोळशापासून वायू तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळल्याने होणारे प्रदूषण कमी होऊ शकेल.

’हरित रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारून तो हरित पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

होणार काय? देशात २०३० पर्यंत सौरऊर्जेची स्थापित क्षमता २८० गिगावॉट म्हणजेच २ लाख ८० हजार मेगावॉट करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी सौरऊर्जा संचाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनआधारित अनुदान योजनेत (पीएलआय) १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.