जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या सूरत डायमंड बोर्स (SDB)मधील फर्म किरण जेम्स यांनी मुंबईत परतण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या SDB च्या उद्घाटनानंतर अवघ्या एका महिन्यातच एका कंपनीने माघार घेतल्याने या प्रकल्पाच्या महत्त्वाकांक्षी भविष्यावर संशय निर्माण झाला आहे.

फ्री प्रेस जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, “आम्ही बैठकीत वल्लभ काकांना त्यांचा किरण जेम्सच्या माध्यमातून चालवला जाणारा व्यवसाय मुंबईला हलवण्यास सांगितले आणि सूरत डायमंड बोर्स सक्रियपणे चालू झाल्यावर परत या, असाही सल्ला दिला,” असे SDB समितीच्या एका मुख्य सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. “तुम्ही एकट्याने इथे व्यापार करू शकत नाही, वल्लभ काका एकटेच होते, त्यांना कोणीही साथ दिली नाही,” असंही तो म्हणाला.

indices Sensex and Nifty fall for fifth session
मंदीवाल्यांच्या माऱ्यातही ‘सेन्सेक्स’ ८० हजारांवर तगून! सलग पाचव्या सत्रात निर्देशांकांत घसरण
What is the meaning of the Olympic rings?
Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
75 customers cheated over rs 66 crore in the name of giving flats in housing project at Sion
सदनिकेच्या नावाखाली ७५ जणांची ६६ कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Chandrapur, World Book of Records, Mayesha Jain, three-month-old, intelligence, World Book of Records, animals, birds, world record, Saloni Jain, brilliant intelligence, videotape, London, certificate, medal, youngest children, extraordinary intelligence, Jain community, Chandrapur news, marathi news, loksatta news,
चंद्रपूर: अवघ्या तीन महिन्यांच्या मायशा जैनची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या काय आहे विशेष…
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
mihir shah worli hit and run case marathi news
Worli Hit and Run Case: अपघाताआधी मिहीरनं जुहूच्या बारमध्ये १८,७३० रुपयांचं बिल भरलं होतं; मित्रांसोबत पार्टीचं CCTV फूटेज पोलिसांच्या हाती!
Rahul Gandhi Comments On Udaipur Tailor Killing Incident
“ती लहान मुलं..”, म्हणत राहुल गांधींचे कन्हैय्या लालची भरदिवसा हत्या करणाऱ्यांना समर्थन? खऱ्या Video तील वाक्य ऐका
Central government  approves Rs 1898 crore loan proposal for sugar millers
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकार मेहेरबान

हेही वाचाः सोने-चांदी महागले, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मोजावी लागणार जास्तीची किंमत

वल्लभभाई लखानी यांच्या नेतृत्वाखाली किरण जेम्स ही नोव्हेंबर २०२३ मध्ये SDB त स्थलांतरित होणारी पहिली प्रमुख व्यापारी फर्म होती, त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी सूरतमध्ये १२०० फ्लॅट बांधण्यात आले होते. SDB च्या मागे असलेल्या लखानींनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि इतरांनाही येथे येण्यास आकर्षित केले. परंतु सूरत डायमंड बोर्समधून म्हणावा तसा व्यापाऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त आहे.

हेही वाचाः विश्लेषण : भारतातील अन्नधान्य चलनवाढीचे जागतिकीकरण कसे रोखणार? आता कोणते घटक निर्णायक ठरणार?

किरण जेम्स मुंबईत परतण्याची अनेकविध कारणे आहेत. सूरतचे कमिशन स्ट्रक्चर स्वीकारण्यास मुंबईतील व्यापाऱ्यांची इच्छा नाही. शहर आणि बोर्सच्या दुर्गम स्थानादरम्यान सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याचे कारण देत वाढत्या तोट्याबद्दलही व्यापाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. “कर्मचारी स्थलांतर करण्यास संकोच करत होते आणि सूरतचे कामगारदेखील लांब प्रवासासाठी उत्सुक नव्हते,” असे समिती सदस्याने सांगितले. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “किरण जेम्सचे भारत डायमंड बाजारातील कार्यालय बंद करून सूरतला तळ हलवण्याचा हा निर्णयच मुळी चुकीचा होता. लखानी किरण जेम्स मुंबईचे कार्यालय चालवू शकले असते आणि सूरतपर्यंत विस्ताराची घोषणा करू शकले असते.”

सूरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाऱ्यांच्या केंद्रस्थानी होती. परंतु SDB उघडल्यानंतर सूरतदेखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल, असे त्यांना वाटत होते. मात्र आता या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमध्ये सूरत डायमंड बोर्सचे (SDB) उद्घाटन करण्यात आले होते, परंतु एक महिन्यातच त्यांनी पुन्हा मुंबईत परतण्याचे ठरवले आहे. डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. येथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापाऱ्यांसाठी कार्यालये आहेत. मात्र, बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी खुद्द आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवत असल्यानं त्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.