या लेखात भूगोलाच्या गतवर्षीय प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेण्यात आला आहे..

मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर १ मधील ‘भूगोल’ या घटकाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या संदर्भग्रंथांचा आढावा घेतला. अभ्यासक्रमामध्ये ‘भारत, दक्षिण आशिया व जगाचा भूगोल’ असे नमूद केलेले आहे. ‘भूगोल’ या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना या विषयाची विभागणी स्वतंत्रपणे दोन घटकांमध्ये करावी लागते-

१. भारताचा भूगोल.

२. जगाचा भूगोल

यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ज्यामध्ये सामाजिक व आíथक भूगोल आणि वसाहत भूगोल अशी विभागणी असते.

प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये (२०१३-२०१५ पर्यंत) या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात. ज्यामध्ये भारताची प्राकृतिक रचना, आíथक व सामाजिक पद्धती, तसेच लोकसंख्या यांसारख्या वैशिष्टय़पूर्ण पलूंवर अधिक भर असतो. याचबरोबर ‘जगाचा भूगोल’ या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असते. या विषयाचे स्वरूप ‘सेमीसायन्टिफिक’ असल्यामुळे या विषयाचा संकल्पनात्मक पाया, याचबरोबर संबंधित प्रदेशाची प्राकृतिक रचना, आíथक व सामाजिक पद्धती, तसेच लोकसंख्या इत्यादींची सखोल माहिती असणे परीक्षेच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते.

गतवर्षांतील प्रश्न-विश्लेषणात्मक आढावा

२०१३ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘दक्षिण भारतातील राज्यामध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न भारताच्या आíथक भूगोलाशी संबंधित आहे. पण यासाठी काही भौगोलिक कारणे महत्त्वाची ठरतात व त्यांचा उल्लेख करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. साखर उद्योग स्थापन करण्यासाठी नसíगकरीत्या पूरक असणारे घटक व उपलब्ध साधनसंपत्ती, सक्षम दळणवळणाचे उपलब्ध पर्याय व यासाठी पूरक असणारी जमीन ज्यामध्ये ऊस हे पीक घेणे अधिक उपयुक्त ठरते इत्यादी माहितीची चर्चा उत्तरामध्ये करणे आपेक्षित आहे.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशांत मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात, कारण..’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलातील हवामान घटकाशी संबंधित आहे व जगातील तीन भौगोलिक स्थानांशी जोडला गेलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित भौगोलिक स्थानांची प्राकृतिक रचना तसेच या प्रदेशातील हवामानपद्धती व याच प्रदेशामध्ये ही चक्रीवादळे इतर प्रदेशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात, याची कारणे सर्वप्रथम माहिती असणे आवश्यक आहे. या प्रश्नांचा रोख हा उष्णदेशीय चक्रीवादळांसाठी नेमके कोणते घटक (प्राकृतिक) जबाबदार आहेत व उत्तरामध्ये फक्त यासाठीची कारणे लिहिणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून असणारी  सुसंगत व समर्पक माहिती उत्तरामध्ये आपण देऊ शकतो.

२०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीमधील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून ही एक गंभीर समस्या आहे. हे असे का आहे,’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व या प्रश्नाचा कल हवामान व पर्यावरणसंबंधी अनुषंगाने होता, पण याचबरोबर या शहरांची भौगोलिक स्थाने व यासाठी कोणते प्राकृतिक घटक, त्याचबरोबर औद्योगिकीकरण व शहरीकरण इत्यादी गोष्टींचा एकत्रित विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

भूगोल या घटकावर  गेल्या तीन वर्षांतील प्रश्नांचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, भूगोलाच्या सर्वच घटकांवर प्रश्न विचारण्यात येतात. मात्र, या प्रश्नांचा भर भारतासंबंधीच्या भूगोलावर होता. त्यातही बहुतांश प्रश्न प्राकृतिक आणि आíथक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले होते. यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी भूगोलविषयीच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडींची माहिती असणे आवश्यक होते. उदाहरणार्थ- २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत.’ या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या उपप्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी स्मार्ट शहरे आणि स्मार्ट खेडे या संकल्पनांमध्ये काय अंतर्भूत आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरांचे ग्रामीण भागावरील अवलंबित्व कशा प्रकारचे आहे? जर शहरे स्मार्ट करायची आहेत तर स्मार्ट खेडय़ाशिवाय, स्मार्ट शहरे कशी शाश्वत होऊ शकत नाहीत याचा एकत्रित विचार करून हा प्रश्न सोडवावा लागतो, ज्यासाठी, सद्य:स्थितीमध्ये ग्रामीण व नागरी जीवनाशी संबंधित समस्या व त्यावर योजलेले उपाय यांची अद्ययावत माहिती हवी. असा प्रश्न सोडविण्यासाठी चालू घडामोडींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी आघाडीची वर्तमानपत्रे, ‘योजना’ व ‘कुरुक्षेत्र’ तसेच ‘पीआयबी’(PIB) ची वेबसाइट यांसारख्या संदर्भाचा उपयोग होऊ शकतो.

थोडक्यात उपरोक्त नमूद केलेल्या गतवर्षीय प्रश्नाचा एक संक्षिप्त आढावा घेण्यातून या विषयाचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नांचा नेमका रोख ओळखतायायला हवा. अपेक्षित असणारी माहिती उत्तरामध्ये समर्पकपणे दिल्यासच चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. प्रत्येक प्रश्नासाठी शब्दमर्यादा आखून दिलेली असते. याचे भान ठेवून परीक्षार्थीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

यापूर्वीच्या लेखामध्ये नमूद केलेल्या संदर्भग्रंथांचा उपयोग करून या विषयाच्या संक्षिप्त स्वरूपात घटकनिहाय स्वत:च्या नोटस् तयार कराव्यात, ज्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने या विषयाची उजळणी कमी कालावधीत करता येईल.

भूगोल या घटकावर गेल्या तीन वर्षांच्या मुख्य परीक्षेमध्ये २०१३- ७, २०१४- १० आणि २०१५- ७ प्रश्न विचारण्यात आलेले होते. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की,भूगोल या विषयातील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. प्रश्नांमध्ये सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर होता, पण बहुतांश प्रश्न प्राकृतिक आणि आíथक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले होते. यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी विषयाच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडींची पाश्र्वभूमी ठाऊक असणे अत्यावश्यक होते.