माधुरी बेंद्रे-लोणकर
आयुष्याच्या प्रवासात कुठल्या वळणावर आपल्याला काय गवसेल आणि आपल्या हातून काय निसटेल हे सांगणं अगदीच अशक्य आहे. पण जे निसटलं त्याचं दु:ख न करता, जे गवसलं त्याचा आनंद उराशी बाळगला तर पुढचं आयुष्य सकारात्मकतेनं जगण्यासाठी नक्कीच मदत होईल.आयुष्याचं प्रत्येक वळण, प्रत्येक टप्पा आपल्याला काही ना काही शिकवून जातो. त्या वळणावर आलेले अनुभव, भेटलेली माणसं, सगळय़ातूनच एक नवीन धडा मिळत जातो, जेणेकरून आयुष्याचा पुढचा प्रवास अधिकाधिक सुखकर होतो. खरं तर जीवनात येणाऱ्या संकटांना, दु:खांना सामोरं जाण्यास आपण तेवढे सक्षम झालेलो असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी कॉलेजमध्ये होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अचानक खालावली. त्या वेळी मी कॉलेज सोडून एक छोटी नोकरी करू लागले. पण शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत सतत मनात बोचत होती. तेव्हा नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला काही मैत्रिणींकडून मिळाला. सुरूवातीला खूप अवघड वाटलं, पण जिद्दीनं नोकरी करत शिक्षणही पूर्ण केलं. पदवीनंतर ‘ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि पुढे चांगली नोकरी मिळाली. हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. माझ्याबरोबर माझी भावंडं आणि आई-वडील सगळय़ांनीच खूप कष्ट करून परिस्थिती बदलली होती. त्या काळात आईचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन माझ्यामध्येही आला. ती सतत आम्हाला सांगायची- ‘रडायचं नाही, लढायचं’. तिच्या या वाक्यानं नेहमीच बळ मिळत गेलं.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meaning of life sorrow to winon the journey college financial situation of the family amy
First published on: 13-08-2022 at 00:03 IST