सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यानंतर या परिसरात मोठी शोध मोहिमही हाती घेण्यात आली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सुरक्षा दलाचे दोन जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास छत्तीसगढ येथील नारायणपूर जिल्ह्यात असलेल्या अबुमझाड भागातल्या जंगलात ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच नक्षलींना ठार केलं. काही नक्षलवादी फरार झाले. त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. Narayanpur: Encounter between security forces and naxals underway in Abujmarh area. Two jawans have been injured. More details awaited. #Chhattisgarh pic.twitter.com/sHnuMQMibc — ANI (@ANI) August 24, 2019 सुरक्षा दलाचे जे जवान जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच ज्या भागात नक्षलींना ठार करण्यात आलं त्या भागात शोध मोहीम राबवण्यात येत असून हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे.