मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ उपाधी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी दिल्याचे इतिहासाच्या पुस्तकातून शिकविले जाते. परंतु गुजरात सरकारचे याबाबतचे मत भिन्न आहे. सौराष्ट्रातील एका अज्ञात पत्रकाराने बापूंना ही उपाधी दिल्याचे गुजरात सरकारचे म्हणणे आहे. आता हे प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात दाखल झाले आहे.

‘राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समिती’ने तलाठी पदासाठी लेखी परिक्षेचे आयोजन कले होते. गांधीजींचे सचिव महादेव देसाईंचे पुत्र नारायण देसाईंच्या आत्मचरित्राचा हवाला देत जैतपुर शहरातील एका अज्ञात पत्रकाराने बापूंना ‘महात्मा’ उपाधी दिल्याचा दावा समितीकडून करण्यात आला आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

संध्या मारू नावाच्या परिक्षार्थीने बापूंसह अन्य काही प्रश्नांवरून या परिक्षेला न्यायालयात आव्हान दिले आहे. गांधीजींना ‘महात्मा’ हा किताब सर्वात प्रथम कोणी बहाल केला? अशा स्वरुपाचा प्रश्न परिक्षेत विचारण्यात आला होता. यासाठी अगोदर टागोर पर्यायाची निवड करण्यात आली होती, अंतिम वेळी यात बदल करून ‘अज्ञात पत्रकार’ असा पर्याय देण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

प्रश्नपत्रिका जिल्हा पंचायत अधिकाऱ्याने नव्हे तर बाहेरून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेने नारायण देसाईंच्या आत्मकथेचा आधार घेत तयार केल्याचे समितीचे वकील हेमंत मुंशो यांनी समितीची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले. १९१६ साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना सर्वात प्रथम ‘महात्मा’ ही उपाधी सौराष्ट्रमधील जैतपुरच्या एका अज्ञात पत्रकाराने दिली. त्यानंतर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हणण्यास सुरुवात केल्याचे गांधीजींसोबत वीस वर्षे व्यतीत केलेल्या नारायण देसाईंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटल्याची माहिती मुंशोंनी दिली.

अशाप्रकारच्या परिक्षा घेताना काळजी घेण्याची ताकीद देत न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला यांनी सदर याचिकेवरील पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवली आहे.