भारत-म्यानमार सीमेवरून आसाम रायफल्सला मागे घेणार नाही किंवा त्यांच्या जागी दुसरी निमलष्करी दले तैनात करण्याचाही विचार नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
आसाम रायफल्सच्या १८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सैनिक संमलेनानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, जेव्हा आम्ही काही निर्णय घेऊ तेव्हा तुम्हाला सांगू.
याआधी तेथे सीमा सुरक्षा दल तैनात करण्याचा विचार होता व त्यासाठीचा आढावा अहवालही तयार करण्यात आला आहे. भारत व म्यानमार यांच्यात १६४३ कि.मी. ची सीमा कुंपणविरहित आहे. आसाम रायफल्सची स्थापना १८३५ मध्ये करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
‘म्यानमार सीमेवरून आसाम रायफल्सला मागे घेणार नाही’- राजनाथ सिंह
आसाम रायफल्सची स्थापना १८३५ मध्ये करण्यात आली होती.

First published on: 23-03-2016 at 02:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh rules out withdrawal of assam rifles from myanmar border