सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होत्या. विचारधारा वेगळ्या असतील तरीही प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहिल असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे निधन झालं.

सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी ट्विटर, सोशल मीडियावरुन सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. आता राज ठाकरे यांनीही सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपल्याबाबत शोक व्यक्त केला आहे.