करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना भारतात आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशात देशातील करोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये तीन लाख ९० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १३५८ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच सलग ४१ दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ६८ हजार ८१७ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत १९,३२७ रुग्णांची घट झाली आहे. सोमवारी ४२,६४० करोना रुग्ण आढळले होते. हे ही वाचा >> vaccination in india : लसीकरणाचा वेग मंदावला India reports 50,848 new #COVID19 cases, 68,817 discharges & 1,358 deaths in last 24 hours as per Union Health Ministry Total cases: 3,00,28,709 Total discharges: 2,89,94,855 Death toll: 3,90,660 Active cases: 6,43,194 pic.twitter.com/DAkwqQXREF — ANI (@ANI) June 23, 2021 आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांची करोनावर मात देशात आतापर्यंत ३ कोटी २८ हजार ७०९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात करोनामुळे ३ लाख ९० हजार ६६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. २२ जूनपर्यंत देशात २९ कोटी ४६ लाख नागरिकांना लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याआधी ५४ लाख २४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. तर आतापर्यंत ३९ कोटी ५९ लाखांपेक्षा जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे ही वाचा >> Covid vaccine: करोना मृत्यू रोखण्यासाठी लसींचा पहिला आणि दुसरा डोस ८२ आणि ९५ टक्के प्रभावी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये डेल्टा प्लसचे २२ रुग्ण केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.