काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. यूपीए सरकारने ७० वर्षांच्या काळात उभ्या केलेल्या सर्व गोष्टी भाजप सरकार विकत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर अमेठीमध्ये राहुल यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे कि, स्मृती म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील खासदार राहुल यांच्या नेतृत्वात अमेठीमध्ये एक जिल्हा रुग्णालयही बांधलं नाही. तर दुसरीकडे करोना संकटाला तोंड देण्यासाठी मोदी सरकारने पीपीई किटपासून अन्य आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहे. “राहुल गांधींची समस्या फक्त ही आहे की या निर्गुंतवणुकीतून त्यांना ६ लाख कोटी रुपये येतील. म्हणूनच त्यांना त्रास होत आहे,” स्मृती इराणी म्हणाल्या.
“मग महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग विकला का?”
“महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कामातून ८,००० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता आम्ही राहुल गांधी यांच्या आरोपाचा असा अर्थ लावायचा का की राज्य सरकारने ते विकलं आहे?”, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासंदर्भात आरएफपी जारी केली होती. २००६ मध्ये विमानतळाचं खासगीकरण सुरू करण्यात आलं होत. “मग आपल्या आईच्याच नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे, रस्ता आणि विमानतळ विकलं असा राहुल गांधी यांचा आरोप आहे का?” असा सवाल देखील स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारचा राजकीय चेहरा म्हणून पाहिलं जायचं, याच संदर्भाने हे विधान करण्यात आलं आहे.
“खरे गुलाम तर…”
भाजप सरकारच्या कार्यकाळात देश गुलामीच्या दिशेने वाटचाल करत आहे या राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना स्मृती म्हणाल्या की, “खरे गुलाम तर ते आहेत जे कौटुंबिक राजवटीसाठी देश तोडण्याची भाषा करतात.” यावेळी स्मृती इराणी यांचा रोख पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी काश्मीर आणि पाकिस्तानबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याकडे होता.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अर्थव्यवस्थेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांणाले कि, “ही एक मोठी शोकांतिका आहे. यूपीएने आपल्या कार्यकाळात जे उभं केलंते ज सरकारने नष्ट केलं आहे. तर, आता शेवटचा उपाय म्हणून काँग्रेसने उभ्या केलेल्या सर्व गोष्टी ते विकत आहेत. याच टीकेनंर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना अनेक प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे.
“डिप्रेस्ड डिफाल्टर डायनेमॅस्टी”
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसला “डिप्रेस्ड डिफाल्टर डायनेमॅस्टी” आणि गोंधळ, विरोधाभासांचा विजेता म्हटले. ते म्हणाले की, मोदी सरकार आणि भाजप देश बांधण्यात मोठा करण्यात मग्न असताना, दुसरीकडे काँग्रेस मात्र देश उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहे.
