मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या आठवड्याभरापासून ईडी कोठडीत आहेत. त्यामुळे दिल्लीचं सरकार नेमकं कोण चालवंतय, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशात आता दिल्ली राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आहे.

महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावल्यास, हा एकप्रकारे राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले होते.

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
sanjay raut reaction on raj thackeray attacked
Sanjay Raut : “ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पण…”; राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचा – भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांना वकिलांनी भररस्त्यात चोपलं? लोकांना झाला आनंद, Video मध्ये नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे न्यायब राज्यपाल यांच्या कार्यलयाला प्रशासनिक पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. गुरुवारी नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावे पत्र लिहिले आहे. दिल्लीतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील कथित लैंगिक छळाच्या प्रकरणानंतरही केजरीवाल यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याची बदली १४ फेब्रुवारीपासून रोखून धरल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. एकंदरितच केजरीवालांच्या अटकेमुळे प्रशासनावर परिणाम होत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न नायब राज्यपालांकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना भाजपाने खासदार मनोज तिवारी म्हणाले, “केजरीवालांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे दिल्लीत संवैधानिक सकंट उभं राहण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवालांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करायचे आहे. मात्र, त्याला आपच्या आमदारांचा विरोध आहे. आपमधील या नाट्याचा त्रास दिल्लीतील जनतेला होतो आहे.”

हेही वाचा – “…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य

दरम्यान, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या चर्चांवरून आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपाल यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “राष्ट्रपती राजवट लागू केल्याने दिल्लीचे प्रशासन राज्यपालांच्या हाती जाईल. खरं तर निवडणूक न लढवता त्यांना दिल्लीचे सरकार चालवायचे आहे. दिल्लीचे सरकार चालवण्यासाठी नायब राज्यपाल उत्सूक आहे”, असे ते म्हणाले. तसेच “दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.