सध्या तरुणाईचे आकर्षण असलेल्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय. सोशल मीडियावर चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत. त्यामुळे धार्मिक दंगलींना चालना मिळते. त्यामुळेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय उपाययोजना करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी दिली. ‘जुनी चिथावणीखोर छायाचित्रे फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सध्या घडलेल्या दंगलींना त्यामुळे चालना मिळाली,’ असे सांगून शिंदे यांनी मुझफ्फरनगर दंगलीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. पाटणा येथील एका हिंदी वृत्तपत्राचे प्रकाशन करताना शिंदे बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेही या वेळी उपस्थित होते. ‘सोशल मीडियावर ईशान्य भारताविषयीही चिथावणीखोर मजकूर प्रसिद्ध झाला होता. तो प्रसिद्ध करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘सोशल मीडिया’चा गैरवापर रोखण्यासाठी उपाययोजना लवकरच
सध्या तरुणाईचे आकर्षण असलेल्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय. सोशल मीडियावर चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत.
First published on: 19-01-2014 at 05:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt mulling check on social media to stop misuse shinde