तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारच्या हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे एक पत्र चर्चेत आहे. वरुण सिंग यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना सामान्य असणे ठीक आहे असे सांगितले आहे.  ग्रुप कॅप्टन सिंग सध्या बंगळुरूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी संदेश दिला होता.

गेल्या वर्षी, वरुण सिंग तेजस विमान उडवत असताना त्यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आली होती. पण एक भयानक अपघात टाळण्यासाठी धैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रदर्शन त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांना ऑगस्टमध्ये शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

१८ सप्टेंबर रोजी, त्यांनी हरियाणातील चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना एक प्रेरणादायी पत्र लिहिले, जे एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनावर प्रतिबिंबित होते. मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात ग्रुप कॅप्टन सिंग म्हणाले होते की, “सामान्य असणे ठीक आहे. प्रत्येकजण शाळेत उत्कृष्ट असेलच असे नाही आणि प्रत्येकजण ९० टक्के गुण मिळवू शकणार नाही. जर तुम्ही असे केले तर ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे.”

IAF helicopter crash: कोण आहेत अपघातात बचावलेले एकमेव ग्रूप कॅप्टन वरुण सिंग, जाणून घ्या

“पण जर तुम्ही ते करू शकत नसाल, तर असे समजू नका की तुम्ही सामान्य आहात, असे पत्रात म्हटले आहे. तुम्ही शाळेत सामान्य असू शकता पण याचा अर्थ असा नाही की जीवनातील गोष्टी समान असतील. तुमच्या हृदयाचा आवाज ऐका. तो कला, संगीत, ग्राफिक डिझाइन, साहित्य इत्यादी असू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल, समर्पित व्हा, सर्वोत्तम करा. मी आणखी प्रयत्न करू शकलो असतो असा विचार करून कधीही झोपू नका,” असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंगने यांनी लिहिले आहे.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी एक तरुण कॅडेट म्हणून त्याच्यात आत्मविश्वास कसा कमी होता याचे वर्णन केले. “फायटर स्क्वॉड्रनमध्ये एक तरुण फ्लाइट लेफ्टनंट म्हणून काम केल्यानंतर, मला जाणवले की मी माझे मन आणि मन लावले तर मी चांगले करू शकेन. मी ‘उत्तीर्ण’ आहे याची खात्री करण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट होण्यासाठी काम करू लागलो,” असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी म्हटले आहे.

“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते, त्यांनी हळू आवाजात नाव सांगितले”; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये कॅडेट म्हणून त्यांनी अभ्यास किंवा खेळात उत्कृष्ट कामगिरी केली नसल्या बद्दलही त्यांनी या पत्रात लिहिले. “जेव्हा मी एएफएमध्ये पोहोचलो तेव्हा मला जाणवले की विमान चालवनाच्या माझ्या आवडीमुळे मी माझ्या समवयस्कांपेक्षा वरचढ ठरलो. तरीही, मला माझ्या खऱ्या क्षमतेवर विश्वास नव्हता,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

“आपण एकत्र निवृत्त होऊ..”; अपघातात निधन झालेल्या सतपाल यांना नोकरी सोडण्यापासून बिपिन रावत यांनी थांबवले होते

पत्रात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी शौर्य चक्र पुरस्कार मिळाल्यावर अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रतिष्ठित पुरस्काराचे श्रेय शाळेत, एनडीए आणि त्यानंतर हवाई दलाशी संबंधित असलेल्या सर्वांना दिले. स्वतःला एक सरासरी विद्यार्थी म्हणून सांगताना, ग्रुप कॅप्टन वरुण सिंगने इयत्ता १२वी मध्ये फर्स्ट डिव्हिजन मिळवले आणि सांगितले की त्यांना शाळेत शिस्तीचे प्रीफेक्ट बनवले गेले.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी लिहिले की ते खेळ आणि इतर सह-अभ्यासक्रमातही तितकाच सामान्य होतो. पण मला विमाने चालवण्याची आवड होती असे त्यांनी म्हटले आहे.

“शत्रूच्या मृत्यूचा आनंद साजरा करू नका कारण..”; माजी पाक मेजरने अनोखा संदेश देत रावत यांना वाहिली श्रद्धांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कधीही आशा सोडू नका, कधीही असा विचार करू नका की तुम्हाला जे व्हायचे आहे त्यात तुम्ही चांगले होऊ शकत नाही. ते सहजासहजी मिळणार नाही. यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी वेळ आणि आरामाचा त्याग करावा लागेल. मी सामान्य होतो आणि आज मी माझ्या कारकिर्दीत कठीण टप्पे गाठले आहेत. तुम्ही आयुष्यात काय साध्य करू शकता हे बारावीचे बोर्डाचे गुण ठरवतात असे समजू नका. स्वत:वर विश्वास ठेवा, त्यासाठी काम करा, असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी पत्रात लिहिले आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी लिहिले की, त्यांची कथा विद्यार्थ्यांसोबत शेअर करावी अशी त्यांची इच्छा आहे. “जर मी लहान मुलाला देखील माझ्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करू शकलो असतो, तर मी हे लिहिण्याचा माझा हेतू साध्य केला असे वाटेल,” असे वरुण सिंग यांनी म्हटले आहे.