US President on India- Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढीला लागलेला असताना अमेरिकेने मध्यस्थी करून दोन्ही देशांत शस्त्रविराम जाहीर केला. दरम्यान, दोन देशातील अंतर्गत वादात अमेरिकेने हस्तक्षेप का केला? दोन देशांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना अचानक दोन्ही देशांनी शस्त्रविराम का पुकारला असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावर आता खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

“शनिवारी माझ्या प्रशासनाने तात्काळ शस्त्रविराम करण्यास मदत केली, मला वाटते की भारत आणि पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी शस्त्रविराम होईल. या दोन्ही देशांमध्ये भरपूर अण्वस्त्रे आहेत”, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “तुम्हाला हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व अढळ आणि शक्तिशाली होते. दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्याकडे परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि धैर्य होते. आणि आम्ही खूप मदत केली आणि व्यापारातही मदत केली. मी म्हणालो आम्ही तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहोत. त्यामुळे युद्ध थांबवूया. जर तुम्ही ते थांबवले तर आम्ही व्यापार करत राहू. जर तुम्ही ते थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही अणुयुद्ध थांबवलं

ते पुढे म्हणाले, “आम्ही एक अणुयुद्ध थांबवले. मला वाटते की ते एक वाईट अणुयुद्ध असू शकले असते. लाखो लोक मारले गेले असते. मी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचेही त्यांच्या कामाबद्दल आभार मानू इच्छितो…”