चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, "आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा." पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, "का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?" क्यों नहीं! हमें तो एक कदम आगे बढ़कर, देश में लगातार बढ़ती 'असत्य की गंदगी' भी साफ़ करनी है। क्या प्रधानमंत्री चीनी आक्रमण का सत्य देश को बताकर इस सत्याग्रह की शुरुआत करेंगे? pic.twitter.com/c3b5bzC48T — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 8, 2020 दरम्यान, चीनने केलेल्या सीमा कराराच्या उल्लंघनाबाबतचा संरक्षण खात्याच्या अहवालातील उल्लेख वगळल्याबद्दल राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "चीनच्या या कुरापतींचा उल्लेख वगळणं हा केवळ योगायोग नाही तर सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. "जेव्हाकेव्हा देश एखाद्या मुद्द्यावर भावनिक होतो तेव्हा फाईल्स गायब होतात. यामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा राफेलची फाईल असो," असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.