पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान म्हणून मला स्विकारण्यास तयार नाही असं म्हणत राज्यघटनेचा अपमान करत आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बंकुरा येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलं. ‘ममता बॅनर्जी सर्वांसमोर पंतप्रधानांना देशाचे प्रमुख मानण्यास नकार देत आहेत, पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे पंतप्रधान म्हणून ओळख देण्यात अभिमान वाटतो’, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव होईल या भीतीने ममता बॅनर्जी राज्यघटनेचा अपमान करत आहेत अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. फॅनी वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळवण्यासाठी फोन केला असता ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं नाही असं मोदींनी यावेळी सांगितलं.
PM Narendra Modi addressing a public rally in Bankura, #WestBengal:Didi desh ke samvidhaan ka apmaan kar rahi hain. Woh keh rahi hain ki desh ke pradhan mantri ko pradhan mantri maanne ke liye tayar nahi hain lekin unko Pakistan ke PM ko PM maanne mein gaurav ka anubhaav hota hai pic.twitter.com/fMlyXuAQWl
— ANI (@ANI) May 9, 2019
‘वादळ आलं असता फोन केला तर त्यांनी उत्तर दिलं नाही. केंद्र सरकारला परिस्थिती माहिती करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती. पण दीदींनी तेदेखील होऊ दिलं नाही’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
PM in Bankura, West Bengal: When cyclone came in West Bengal, I called ‘didi’ again & again, but because of her ego, she didn’t think it was appropriate to talk to PM.Central Govt wanted to talk with the officers here & help the state, but ‘didi’ refused to even hold that meeting pic.twitter.com/Nr9F9hYjI1
— ANI (@ANI) May 9, 2019
ममता बॅनर्जी यांनी ६ मे रोजी प्रचारसभेत बोलताना आपम नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून स्विकारत नाही असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचा ‘एक्स्पायरी पीएम’ असा उल्लेख केला होता. निवडणुकीनंतर आपण नवीन पंतप्रधानांशी चर्चा करु असा टोला यावेळी त्यांनी लगावला होता.
ममता बॅनर्जी यांची राज्याचं भलं व्हावं अशी अजिबात इच्छा नाही असा आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. ‘आपण जी भाषा वापरत आहोत त्याबद्दल टीएमसी प्रमुखांना कसलीच चिंता नाही. त्या सध्या दगड आणि कानाखालीची भाषा वापरत आहेत. मला आता टीकेची सवय झाली आहे. जगातील कोणतीही टीका पचवण्याचं कौशल्य माझ्यात निर्माण झालं आहे’, असं मोदींनी सांगितलं.