अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्या एका खळबळजनक दाव्यामुळे पाकिस्तानाच्या कुरापती पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत. तर भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दाखवलेली चाणाक्ष वृत्ती भारताच्या कामी आली असल्याचे एका प्रसंगातून पुढे आले आहे. ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात पॉम्पियो यांनी लिहिले की, भारताने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राइक नंतर पाकिस्तान अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत होता. मात्र सुषमा स्वराज यांनी वेळीच संकट टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती रात्र मी कधीही विसरु शकत नाही

आपल्या पुस्तकात पॉम्पियो लिहितात की, ही गोष्ट २७-२८ फेब्रुवारी २०१९ ची आहे. मी अमेरिका – उत्तर कोरिया शिखर संमेलनामध्ये होतो. त्याचवेळी आम्हाला सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनंतर रात्रभर जागून काम करावे लागले होते. एक मोठं संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधितांशी चर्चा करत होतो. जगाला त्या रात्रीविषयी कळले पाहिजे की तेव्हा भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mike pompeo claims sushma swaraj informed him pakistan was preparing for nuclear attack after balakot surgical strike kvg
First published on: 25-01-2023 at 11:40 IST