अधिकृतपणे देशाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रानेसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रात इंडियाचे नाव बदलून भारत ठेवण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू, असे संयुक्त राष्ट्राच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. G20 शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रावर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिलेले पत्र व्हायरल झाल्यानंतर इंडिया विरुद्ध भारत अशी चर्चा सुरू झाली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांना इंडियाचे भारत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आल्यास काय होणार, असे विचारले असता ते म्हणाले, असा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. तुर्कीने आपले नाव बदलून तुर्कीये ठेवल्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या औपचारिक विनंतीला सहमती दिल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

हेही वाचाः काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

फरहान हक यांनी इंडियाचे नाव बदलून भारत करण्याच्या वृत्ताच्या आधारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘तुर्कस्तानच्या बाबतीत तेथील सरकारने आम्हाला दिलेल्या औपचारिक विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली. साहजिकच जर आम्हाला अशा विनंत्या आल्,या तर आम्ही त्यांचा नक्कीच विचार करू. इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यावर विरोधक एका सुरात निषेध नोंदवत आहेत.

हेही वाचाः २२० सभा, ६० शहरे अन् १५ दशलक्ष लोक, अशा प्रकारे जी २० देशाची अर्थव्यवस्था बदलणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

G20 निमंत्रण मेजवानी व्यतिरिक्त पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या प्रेस नोटवर भारताचे पंतप्रधान देखील लिहिले गेले होते, ती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेअर केली होती. G20 च्या भारतीय प्रतिनिधींच्या ओळखपत्रांवरही भारत हा शब्द नमूद करण्यात आला आहे.