Which Fruit Should Not Carry in Train: भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा भारतीयांसाठी दळणवळणाचा सर्वात मोठा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेक जण रेल्वेला जास्त प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे ही अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे; तर काही गोष्टी आपल्या माहिती नसल्याने अत्यंत रोचक, रंजक वाटतात. भारतात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल अनेकांना माहीत नसते. भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीचे नियम ठरवले आहेत. रेल्वेमधून नेण्यात येणार्या सामानासाठी सुद्धा एक नियम आहे. मात्र, अनेक लोकांना हा नियम माहीत नाही.
रेल्वेचे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत. पण, त्याविषयी प्रवाशांना फार कमी माहिती असते. रेल्वेतून रोजचा प्रवास करताना आपणाला रेल्वेचे प्रत्येक नियम माहिती असतातच असे नाही. त्यातीलच एका नियमाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याविषयी तुम्हालाही माहिती नसेल. ट्रेनमध्ये मर्यादित प्रमाणात सामान नेण्याबाबत तुम्हाला माहिती असेल. त्यासोबतच ट्रेनमध्ये स्फोटके, सिलेंडर, माचीस घेऊन जाण्यास मनाई आहे. पण, असे एक फळ आहे जे ट्रेनमधून नेण्यास मनाई आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की एक फळ असंही आहे, जे ट्रेन प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठीदेखील एक वेगळा नियम आहे. रेल्वेच्या नियमावलीनुसार तुम्ही हे फळ प्रवासात नेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला दंडदेखील ठोठावला जाऊ शकतो.
रेल्वेच्या नियमांनुसार स्टोव्ह, गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके, सिगारेट आणि स्फोटके नेण्यास मनाई असते; यांसारख्या वस्तू ट्रेनमध्ये नेऊ नयेत, कारण त्यांच्यामुळे आग लागण्याची शक्यता नेहमीच असते. पण, रेल्वेच्या नियमानुसार या फळाला ज्वलनशील पदार्थ असं म्हटलं आहे. आता फळ ज्वलनशील कसं काय असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हे फळ म्हणजे सुका नारळ आहे. सुका नारळ तुम्ही ट्रेनमधून घेऊन जाऊ शकत नाहीत. तो लवकर सडण्याची भीती, तसंच त्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना हे फळ तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ नका. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, सुक्या नारळाच्या बाहेरील भागाला ज्वलनशील मानले जाते, ज्यामुळे आगीचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुके नारळ ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जर एखादा प्रवासी ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना आढळला तर रेल्वे त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. प्रवाशाला १००० रुपये दंड, तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.