जगातील श्रीमंत लोक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात यूकेमधून जास्तीत जास्त श्रीमंत लोक इतरत्र स्थलांतर करीत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हेन्ली अँड पार्टनर्सने एक नवीन अहवाल तयार केला आहे. हा अहवाल त्या देशांसदर्भात आहे, जे देश गुंतवणुकीनुसार निवास आणि नागरिकत्वाच्या बाबतीत जागतिक आघाडीवर असल्याचे सांगतात. या अहवालात सध्याच्या काळात कोणते देश त्यांचे श्रीमंत रहिवासी गमावत आहेत आणि भविष्यात किती श्रीमंत रहिवासी गमावतील याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
अहवालात नेमकं काय?
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२५ नुसार, २०२५ मध्ये ३ हजार ५०० भारतीय लक्षाधीश परदेशात स्थायिक होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे. २०२३ मध्ये ५ हजार १०० भारतीय लक्षाधीश भारत सोडून जातील आणि २०२४ मध्ये ४ हजार ३०० लक्षाधीश परदेशात स्थायिक होण्यासाठी भारत सोडून जातील अशी अपेक्षा होती. हे परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीय लक्षाधीशांमध्ये घट होत चालल्याचे दर्शविते. या अहवालानुसार, जगभरात २०२५ मध्ये किमान १.४२ लाख करोडपती स्थलांतरित होणार आहेत. २०२६ पर्यंत ही संख्या आणखी वाढून १.६५ लाख इतकी होईल. अहवालात ज्यांच्याकडे ८.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वरूपातील संपत्ती आहे अशा लोकांबाबतची माहिती दिली आहे.
“२०२५ हा एक महत्त्वाचा क्षण आहे, असे हेन्ली अँड पार्टनर्सचे सीईओ डॉ. जुर्ग स्टेफेन यांनी म्हटले आहे. “दशकांच्या ट्रॅंकिंगमध्ये पहिल्यांदाच एक युरोपीय देश करोडपतींच्या बाहेर जाण्याबाबतीत जगात आघाडीवर आहे. हे केवळ कर व्यवस्थेतील बदलांबद्दल नाही. श्रीमंतांमध्ये अधिक संधी, स्वातंत्र्य आणि स्थिरता इतरत्र आहे, ही खोलवरची धारणा दाखवून देते. युरोप आणि यूकेच्या आर्थिक स्पर्धात्मक आणि गुंतवणुकीय आकर्षणासाठी दीर्घकालीन परिणाम महत्त्वपूर्ण आहेत.”
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशनच्या २०२४ च्या अहवालानुसार, ४,३०० अब्जोपतींनी वर्षाच्या अखेरपर्यंत हा देश सोडला. त्याआधी ५,१०० श्रीमंत भारत सोडून गेले आहेत. संयुक्त अरब अमिराती, थायलंड, बाली, लंडन किंवा फ्रान्समध्ये महागडे घर आहे, असे सांगणे ही भारतीय श्रीमंत लोकांसाठी फॅशन झाली आहे. भारतातील अनेक उद्योगपतींची घरे लंडनमधील मेफेअर या भागात आहेत.
भारतीयांचे नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. याचाच अर्थ इतर देशांतील संपूर्णपणे नवीन सामाजिक आणि सांस्कृतिक रचना त्यांना आकर्षित करते. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी गेल्या वर्षी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०११ पासून १६ लाखांहून अधिक सर्वसाधारण भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. कॅरिबियनमधील अँटिग्वा, स्पेनसारखे देश, तसेच ग्रीस आणि संयुक्त अरब अमिरातीमधून गोल्डन व्हिसाचे आमिष दाखवले जात असल्याने धनाढ्य भारतीयांना या देशांच्या नागरिकत्वासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर वाटते.
कोणत्या देशांना सर्वाधिक फायदा?
बहुतेक लक्षाधीश सुमारे नऊ हजार ८०० संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षी सुमारे ६ हजार ७०० लक्षाधीश आखाती राष्ट्रांत गेले आहेत. अहवालानुसार, यूएईचा गोल्डन व्हिसा कार्यक्रम, त्याचा शून्य उत्पन्न कर, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा व राजकीय स्थिरता यांमुळे ते अतिश्रीमंतांसाठी एक सर्वोच्च निवड ठरले आहेत. अमेरिकेत सुमारे सात हजार ५०० करोडपती स्वित्झर्लंडला जाणार आहेत. सुमारे दोन हजार ४०० करोड सौदी अरेबियाला जाणार आहेत. गेल्या वर्षी ३०० श्रीमंत लोकांनी सौदी अरेबियाला स्थलांतरित केले होते. त्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. इटली, पोर्तुगाल व ग्रीस हीदेखील श्रीमंतांसाठी आकर्षक ठिकाणं ठरत आहेत. येथे अनुक्रमे तीन हजार ६००, एक हजार ४०० व एक हजार २०० पेक्षा जास्त लोक या देशांमध्ये स्थलांतरित होणार आहेत. “सुमारे ६३ अब्ज डॉलर्सच्या अंदाजे सामूहिक गुंतवणूकयोग्य संपत्तीसह यूएई व्यापक धोरणात्मक नवीन उपक्रमाद्वारे प्रादेशिक केंद्रापासून जागतिक संपत्तीच्या वाढीस, जोडणीत विकसित झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
कोणते देश सर्वांत जास्त श्रीमंत गमावतील?
२०२५ मध्ये यूकेला त्यांच्या देशातून सर्वांत जास्त संपत्ती असलेले लोक निघून जाताना दिसणार आहेत. या वर्षी सुमारे १६ हजार ५०० श्रीमंत लोक यूके सोडण्याची अपेक्षा आहे. एफएक्स गार्डचे अध्यक्ष, सह संस्थापक व लॉयड्स बँक कमर्शियल बँकिंगचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर ट्रेवर विल्यम्स यांनी अहवालात यूकेबद्दल धोक्याची घंटा वाजवली. “२०१४ पासून यूकेमध्ये निवासी करोडपतींची संख्या जागतिक सरासरीच्या ४० टक्के वाढीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच कालावधीत अमेरिकेत श्रीमंतांमध्ये ७८ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, श्रीमंत लोक खरोखरच यूके सोडत नाहीत. उलट ते फक्त कागदपत्रे दाखल करीत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची मालमत्ता इतरत्र नेता येते.
२०२५ मध्ये चीनमध्ये सुमारे साच हजार ८०० श्रीमंत गमावण्याची शक्यता आहे. गेल्या दशकात दरवर्षी सर्वाधिक श्रीमंत देश सोडून जात आहेत. २०२५ मध्ये भारतातून तीन हजार ५०० श्रीमंत देश सोडून जातील, तर दक्षिण कोरिया दोन हजार ४०० श्रीमंत गमावण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये रशिया व ब्राझीलमधून अनुक्रमे सुमारे एक हजार ५०० व एक हजार २०० श्रीमंत देश सोडून जातील. फ्रान्स, स्पेन व जर्मनीमधून अनुक्रमे ८००, ५०० व ४०० लोक निघून जातील, अशी माहिती या अहवालात आहे.
या अहवालात अल्फाजिओचे सर्वाधिक विक्री होणारे लेखक व संस्थापक सीईओ डॉ. पराग खन्ना यांनी सांगितले आहे, “आशियाच्या संपत्तीचा आवाका महत्त्वाकांक्षा आणि सावधगिरीचे गतिमान मिश्रण आहे. सिंगापूर आणि जपान जागतिक संपत्तीचे आश्रयस्थान म्हणून त्यांची प्रतिष्ठा मजबूत करीत आहेत, तर चीन आणि भारत विविधतेच्या कल्पनेसह देशांतर्गत संधी निर्माण करण्यासाठी समतोल साधत आहेत. २०२५ जसजसे सरत आहे, तसतसे आशिया जागतिक संपत्ती ट्रेंडच्या केंद्रस्थानी राहणार आहे, ज्यामुळे आर्थिक गतिमानता, धोरणात्मक नवीन उपक्रम, सुरक्षितता आणि वाढ यांच्या सततच्या शोधामुळे तो झालेला बदल असेल