कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठची ११ एकर जमीन वाहून गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. या ठिकाणी आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.कृष्णा नदीच्या एका बाजूला कनवाड हे गाव आहे तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ गाव आहे. म्हैशाळ येथे नवा मोठा बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने म्हैशाळ हद्दीत नदीच्या पात्रात मातीचा तात्पुरता बांध उभारला होता.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कृष्णा नदीने पात्र बदलल्याने गट नंबर १७५ ते २०० या शिवारातील सुमारे अकरा एकर शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांची एक ते अर्धा एकर जमीन वाहून गेल्याने ते भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतजमीन वाहून जाण्याचा धोका वाढल्याने हे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्काळ पंचनामा करा

कनवाड गावातील कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या अकरा एकर शेतीच्या नुकसानप्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तत्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत आमदार यड्रावकर यांनी तातडीने लक्ष घालत घटनास्थळी भेट दिली. तलाठी शिकलगार