कोल्हापूर : इतक्या वर्षाच्या कालावधीत छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केलेले नाही, अशा शब्दांत सदाशिवराव मंडलिक सहकारी कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शाहू महाराज हे गादीचे खरे वारसदार नाहीत, मान गादीला मत मोदीला अशा त्यांच्या विधानावरून वादाचे काहूर उठले असताना आता त्यात मंडलिक घराण्यातील धाकट्या पातीने उडी घेतली आहे.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

unesco team inspection Raigad fort
युनेस्कोच्या पथकाने का केली रायगड किल्ल्याची पाहणी? जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता किती?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
mahayuti erect and unveil chhatrapati shivaji maharaj statue across maharashtra ahead of assembly election
निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना शिवप्रेमाचे भरते ;छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा सपाटा
Rahul Gandh
Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?
Gold coin of Chhatrapati Appasaheb Maharaj in Satara Museum
छत्रपती आप्पासाहेब महाराजांची सुवर्णमुद्रा सातारा संग्रहालयात
Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव
sambhajinagar ganesh mandal fight marathi news,
छत्रपती संभाजीनगर: गणेश मंडळांमधील वाद, तरुण अत्यवस्थ; मुलाच्या परिस्थितीस पोलीस कारणीभूत, पित्याचा आरोप

कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाही. १५ वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही, अशी तोफ डागली. राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी लौकिक वाढवला. त्यांनी छत्रपती शाहू साखर कारखाना उभा केला. तो यशस्वी चालवला असल्याने आम्हींही आमचा कारखाना तसा चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले.