Premium

ODI WC 2007: “… म्हणून स्वत:ला दोन दिवस बंद करुन घेतले होते”; वीरेंद्र सेहवागने २००७ च्या आठवणींना दिला उजाळा

Virender Sehwag: भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी भारतीय संघ लीग स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर त्याने काय केले होते, ते सांगितले.

Virender Sehwag Reveals About ODI World Cup 2007
वीरेंद्र सेहवाग (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Virender Sehwag Reveals About ODI World Cup 2007: माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने स्वतःला दोन दिवस बंद का ठेवले होते ते सांगितले. त्या विश्वचषकात टीम इंडियाला लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले होते. स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध संघ हरला होता. विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाकडे परतण्यासाठी दोन दिवस तिकीटही नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताकडे सर्वोत्तम एकदिवसीय संघ होता –

बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसऱ्या सामन्यात बर्म्युडाचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा प्रकारे संघाला साखळी सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सेहवागने या सर्व गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी भारताकडे सर्वोत्तम एकदिवसीय संघ होता, असेही तो म्हणाला.

म्हणून हे अधिक दुखावणारे होते –

या शोमध्ये बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “२००७ चा एकदिवसीय विश्वचषक सर्वात दुखावणारा होता. कारण २००७ मध्ये आमचा संघ सर्वोत्तम संघ होता. कागदावर चांगला संघ शोधायला गेला, तर वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर असा संघ सापडणार नाही. गेल्या हंगामातही आम्ही फायनल खेळलो, पुढच्या आवृत्तीत आम्ही विश्वचषक जिंकला, पण तो संघ नव्हता. त्यामुळे हे अधिक दुखावणारे होते. कारण आम्ही तीन पैकी दोन सामने गमावले होते आणि आम्ही बाहेर पडलो होतो.”

हेही वाचा – WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनने अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचे केले कौतुक; म्हणाला, “आयपीएलमध्ये खूप काही…”

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “तुम्हाला माहित आहे का? यापेक्षा जास्त दु:ख कशाचे झाले होते. प्रत्येकाला वाटले की भारत पुढच्या फेरीत जाईल आणि मग जेव्हा साखळी सामन्यांची फेरी संपली, तेव्हा दोन दिवसांचा ब्रेक होता. मग त्यानंतर आम्हाला परत यायचं होतं. पण आम्ही हरलो तेव्हा आमच्याकडे तिकिटे नव्हती. त्यामुळे आम्हाला त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आणखी २ दिवस थांबावे लागले. त्यावेळी आमच्याकडे सराव करणे किंवा इतर कोणतेही काम नव्हते.”

हेही वाचा – Virender Sehwag: “आता माझे केस शोएब अख्तरच्या…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूला वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

त्यामुळे वीरेंद्र सेहवागने स्वत:ला दोन दिवस बंद करु घेतले होते. सेहवाग पुढे म्हणाला, “माझ्या रूममध्ये रूम-सर्व्हिस करणारे लोक नव्हते, घरकाम करणाऱ्या लोकांना बोलावले नव्हते. मलाही बाहेर जाता येत नव्हते. मला कोणाचा चेहराही दिसला नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 14:27 IST
Next Story
WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनने अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचे केले कौतुक; म्हणाला, “आयपीएलमध्ये खूप काही…”