भारताचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकात सहभागी झाला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटही सुरू आहे, अंडर-१९ वनडे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये मंगळवारी एक गमतीशीर गोष्ट घडली, ज्यामुळे सोशल मीडियावर बराच गोंधळ उडाला.

जयपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला भारत-अ आणि महिला भारत-ब संघादरम्यानच्या सामन्यात कर्णधार अनुष्का शर्माने शानदार खेळी केली, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. उत्कृष्ट फलंदाजीनंतर अनुष्का शर्मानेही उत्कृष्ट गोलंदाजी केली, अनुष्काने एकूण ५ विकेट घेतल्या.

खरे तर अनुष्का शर्मा ही इंडिया-ब संघाची कर्णधार आहे. तिने सोमवारी ७२ धावांची खेळी केली आणि सहकारी फलंदाज जी. त्रिशासोबत १८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बीसीसीआयने अनुष्काच्या कामगिरीबाबत ट्वीट केले. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – T20 WC: “भारतीय संघात फूट, एक गट विराटच्या…”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं धक्कादायक वक्तव्य!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे नाव देखील अनुष्का शर्मा आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना ट्रोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. त्यांनी विराट आणि अनुष्काबद्दल मीम्स बनवले. टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघ स्पर्धेबाहेर होण्याची दाट शक्यता आहे.