मुंबई : साखळी फेरीत वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ आणि महत्त्वाच्या क्षणी आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा न्यूझीलंड संघ यांच्यात उद्या, बुधवारी उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे  स्टेडियमवर होणऱ्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांत दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा भरणा असून फलंदाजांचा कस लागणार आहे.

वानखेडेवर आव्हानाचा पाठलाग करताना संघांना अडचण येत असल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारणे शक्य होते. परंतु प्रकाशझोतात सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळले. याच मैदानावर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यांसमोर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली होती. श्रीलंकेचा संघ ५५ धावांत गारद झाला होता. त्यानंतरच्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी स्थिती केली होती. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने अविश्वसनीय द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. परंतु अशी खेळी वारंवार पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे वानखेडेवर नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याला कर्णधार पसंती देतात. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक जिंकेल, अशी भारतीय चाहत्यांना  आशा असेल.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Three Mumbai Indians are among the top 5 players to score the most runs in Tests at Wankhede Stadium
Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

हेही वाचा >>> वानखेडेवर भारताविरुद्ध खेळण्याचे स्वप्न – रचिन

वानखेडेच्या खेळपट्टीवर नेहमीच चांगली उसळी असते. त्यातच भारतीय संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि सिराज यांसारखे, तर न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन आणि टीम साऊदी यांसारख वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाणार नाही. भारतीय संघातील सर्वच फलंदाज सध्या जोरात आहेत.

कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी एक, तर विराट कोहलीने दोन शतके साकारली आहेत. शुभमन गिलला मोठी खेळी करता आलेली नसली, तरी तो सातत्याने धावा करत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी डावखुऱ्या रचिन रवींद्रने अप्रतिम फलंदाजी केली आहे.

तसेच न्यूझीलंडकडे कर्णधार केन विल्यम्सन, डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेल यांसारखे फलंदाज आहेत. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखा असेल.

भारतीय संघावर दडपण — टेलर

मायदेशात विश्वचषक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यातच भारतीय संघाने साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. न्यूझीलंडला हरवणे सोपे जाणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताने याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघावर दडपण असेल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने व्यक्त केले. तसेच नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. न्यूझीलंडला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली सुरुवात मिळाल्यास त्यांना रोखणे अवघड जाईल. भारताविरुद्ध जिंकायचे झाल्यास पहिल्या दहा षटकांत त्यांचे दोन—तीन गडी बाद करणे आवश्यक आहे, असेही टेलर म्हणाला.

Story img Loader