What ICC rules say about substitute fielder : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटीतून अचानक बाहेर पडला. बीसीसीआयने सांगितले की, कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे अश्विनला राजकोटहून चेन्नईतील त्याच्या घरी परतावे लागले. यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खऱ्या कारणाला दुजोरा दिला. त्याने सांगितले की अश्विनची आई आजारी आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाकडे तिसऱ्या कसोटीत फक्त १० खेळाडू शिल्लक आहेत.

त्याचबरोबर गोलंदाजाअभावी आता सर्व जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर आली आहे. आता प्रश्न असा पडतो की या कसोटीच्या उर्वरित भागात भारताला केवळ १० खेळाडूंसह खेळावे लागेल की अश्विनच्या जागी संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये देवदत्त पडिक्कलचा समावेश केला आहे. मात्र पर्यायी खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी आयसीसीचा नियम काय सांगतो, जाणून घेऊया.

IND vs BAN 2nd Test Akash Deep smashes 2 Sixes video viral
IND vs BAN : आकाश दीपने विराटच्या बॅटने ठोकले २ गगनचुंबी षटकार, कोहली-रोहितसह गंभीरही चकित, पाहा VIDEO
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
IND vs BAN Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record
IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
IND vs BAN Yashasvi Jaiswal grabs Zakir Hasan catch video viral
IND vs BAN : बुमराहच्या गोलंदाजीवर यशस्वीने झाकीरचा ‘डायव्हिंग’ करत घेतला उत्कृष्ट झेल, VIDEO व्हायरल
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

बदली क्षेत्ररक्षकाला परवानगी मिळू शकते

नियमांनुसार अश्विनने पुनरागमन न केल्यास भारताला उर्वरित सामन्यांमध्ये केवळ १० खेळाडूंसह खेळावे लागले असते. अश्विनच्या अनुपस्थितीत टीम इंडियाकडे आता १० आउटफिल्ड खेळाडू आहेत. यापैकी चार स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत. मॅरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार, जर पंचांना स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू दुखापत झाला आहे किंवा तो आजारी पडला आहे असे समाधानी असेल, तर पंच बदली क्षेत्ररक्षकाला मैदानात उतरण्याची परवानगी देऊ शकतात.

हेही वाचा – विश्लेषण : फुटबॉल जगज्जेते, ऑलिम्पिक जेते ब्राझील पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरले? ‘सांबा’ला घरघर? 

आयसीसीचा नियम काय सांगतो?

एमसीसी नियम क्रमांक २४.१.१.२ नुसार, एक संघ ‘पूर्णपणे स्वीकार्य कारणास्तव’ पर्यायी क्षेत्ररक्षक देखील उतरवू शकतो. नियम २४.१.२ नुसार, बदली क्षेत्ररक्षक गोलंदाजी करू शकत नाही किंवा कर्णधार म्हणून काम करू शकत नाही, परंतु पंचांच्या संमतीनेच विकेटकीपर म्हणून काम करू शकतो. अश्विन आजारी किंवा दुखापत नसल्यामुळे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या संमतीनंतरच भारताला राजकोटमध्ये पर्यायी क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली जाईल.

बदली क्षेत्ररक्षकाचे काम काय असेल?

बदली क्षेत्ररक्षकाला उर्वरित सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. फक्त कन्कशनच्या बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला गोलंदाजाची उणीव भासू शकते. तसेच खालच्या फळीत चांगल्या फलंदाजाची कमतरता भासू शकते. भारताचा माजी कर्णधार कुंबळेला मागे टाकत अश्विन सर्वात वेगवान ५०० कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. एकूणच, तो श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर दुसरा जलद ५०० बळी घेणारा गोलंदाज आहे.