Indo-Pak war of words on Asia Cup Ravichandran Ashwin gave a befitting reply to Javed Miandad | Loksatta

IND vs PAK: “पाकिस्तानच काय दुबईपण नाही खेळणार…” भारताचा स्टार फिरकीपटूचे जावेद मियाँदादला चोख प्रत्युत्तर

BCCIने आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानात न जाण्याचे सांगितले, तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने आदल्या दिवशी बीसीसीआयबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले होते त्यावर अनेक खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत.

Indo-Pak war of words on Asia Cup Ravichandran Ashwin gave a befitting reply to Javed Miandad
सौजन्य- (ट्विटर)

Ashwin Retaliates After Javed Miandad’s Threat: आशिया चषक स्पर्धेवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन असे मानतो की या वर्षाच्या शेवटी भारतात होणारी ही ५० षटकांच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खूप मोठी असून त्यावर बहिष्कार टाकण्याचे धाडस पाकिस्तानकडे नाही. गेल्या काही दिवसांपासून हा विषय खूप अधिक चिघळत चालला असून बैठकांचे सत्र सुरु आहे.

BCCI ने आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानात न जाण्याचे सांगितले, तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने आदल्या दिवशी बीसीसीआयबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले होते, आता रविचंद्रन अश्विनने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. रविचंद्रन अश्विन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतात येण्यासाठी अनेकवेळा नकार दिला आहे असे आपण ऐकतो. तेव्हा अनेकदा असे घडते की स्पर्धा बाहेर कुठेतरी हलवावी लागते.अशावेळी नेहमी तो दुबईला पोहचतो. अश्विन म्हणाला की, “यावेळी आशिया चषक श्रीलंकेत हलवावा, कारण प्रत्येक वेळी तो दुबईला पोहोचतो.”

हेही वाचा: On This Day: जेव्हा पाकिस्तानची होते पळताभुई थोडी…; जंबोच्या तुफान पराक्रमाची गाथा सांगणारा video खुद्द BCCIने च केला शेअर

आशिया चषक २०२३ श्रीलंकेत होऊ शकतो

अश्विन म्हणाला, “अनेकदा असे हे घडताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आम्ही त्यांच्या जागेवर जाणार नाही, असे म्हटल्यावर तेही आमच्या जागेवर येणार नाहीत, असे म्हणतील. त्याचप्रमाणे पाकिस्तानने विश्वचषकासाठी भारतात येणार नसल्याचे सांगितले आहे, पण मला वाटते की ते शक्य नाही.आशिया चषक २०२३चे ठिकाण श्रीलंकेत हलवले जाऊ शकते असेही अश्विनने सांगितले.”

रविचंद्रन अश्विनचे जावेद मियाँदादला चोख प्रत्युतर

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची ही प्रतिक्रिया जावेद मियाँदादच्या विधानानंतर आली आहे, ज्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणाला होता की, “जर भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला आला नाही तर तो नरकात जाऊ देत आपण आपले आपले खेळू.” यावर पुढे बोलताना अश्विन म्हणाला, “आशिया चषक श्रीलंकेला नेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. ५० षटकांच्या विश्वचषकासाठी हा महत्त्वाचा पुढाकार असू शकतो. दुबईमध्ये अनेक स्पर्धा झाल्या आहेत. श्रीलंकेला नेले तर मलाही आनंद होईल.”

हेही वाचा: ILT20 2023: ‘काट्याचा नायटा म्हणतात ते असं!’ कॅच पकडायला गेला अन् थेट स्ट्रेचरवर बसून रुग्णालयात, Video व्हायरल

एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने पाकिस्तानला जाणार नसल्याचा पुनरुच्चार

या आठवड्याच्या सुरुवातीला बहारीन येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पाकिस्तानला जाण्यास भारताच्या नकाराचा पुनरुच्चार करण्यात आला. बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार देण्याचे कारण म्हणजे ‘भारत सरकारकडून मंजुरी’ मिळणार नाही. पुढील महिन्यात समितीची पुन्हा बैठक होईल तेव्हा एसीसी यजमान आणि स्थळ याविषयी चर्चा करेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:17 IST
Next Story
ICC Player of the Month नामांकन जाहीर; डेव्हॉन कॉनवेसह ‘या’ दोन भारतीयांमध्ये चुरस, पाहा कोण आहेत