भारतीय फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारे टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही दिग्गजांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ गुवाहाटी एकदिवसीय सामन्यादरम्यानचा आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा ६७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला, मात्र या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू विकेट पडल्यानंतर सेलिब्रेशन करत होते, मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सेलिब्रेशन दरम्यान, सर्व खेळाडू विकेटच्या आनंदात एकमेकांना ‘हाय फाइव्ह’ करत होते, तेव्हा अष्टपैलू हार्दिक पांड्याने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले नाही.

यादरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडूने विराट कोहलीच्या डोक्यावरील टोपीही हलवली. यानंतरही विराट कोहलीने हार्दिक पांड्याला थोडे बघण्यास सांगितले. तरीही हार्दिक पांड्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी बोलणेही त्याला आवडले नाही. मात्र, हार्दिक पांड्याने विनोद म्हणून हे केले का? तूर्तास निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.

हार्दिक पांड्यानं सर्व खेळाडूंना हायफाय केलं पण विराट कोहलीला नजरअंदाज केलं. यादरम्यान हार्दिक पांड्याचा हात विराट कोहलीच्या टोपीला लागला. त्यावेली विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये काहीतरी संवाद झाला… त्यानंतर हार्दिक पांड्यानं विराट कोहलीला नजरअंदाज केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये बिनसलेय का? असा सवाल अनेक चाहत्यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: केएल राहुलचे झुंजार अर्धशतक! भारताचा चार गडी राखून विजय, मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची मालिकेत २-० विजयी आघाडी

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१२ जानेवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन खेळला गेला. टीम इंडियाने ६ गडी राखत शानदार विजय संपादन केला आणि यासह मालिकाही २-० ने खिशात घातली. मात्र सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांनी विजयासाठी फार झुंजवले. भारताचे पहिल्या १५ षटकात ४ गडी बाद करत अडचणीत आणले. पण केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी ७५ धावांच्या भागीदारीने विजय मिळवून दिला.