भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे तिन्ही सामने होणार आहेत. बीसीसीआयच्या अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने पहिल्या वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात इशान किशन आणि शाहरुख खान यांचा समावेश करण्यात आला आहे.

सध्याची परिस्थिती पाहता सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पहिला वनडे सामना ऐतिहासिक ठरणार आहे. भारताचा हा १०००वा वनडे सामना असेल. भारतीय संघ १००० वनडे सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा – वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी ऋषभ पंत झाला मालामाल; मिळणार ‘इतके’ कोटी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, इशान किशन, शाहरुख खान.