ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय महिला संघाचे विजयी सलामीचे लक्ष्य असेल. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तयारी अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेला केवळ दोन महिने शिल्लक असताना, या पाच सामन्यांनंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांची किती तयारी झाली आहे याचा अंदाज येणार आहे.

मालिकेच्या तीन दिवस आधी मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांना पदावरून काढत माजी भारतीय फलंदाज हृषिकेश कानिटकर यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. भारताने ऑक्टोबरमध्ये आशिया चषक जिंकण्यात यश मिळवले. संघामध्ये केलेल्या विविध प्रयोगांचा परिणाम पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात पराभवाने केला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरोधात ९ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. ही मालिका मुंबईतील दोन ठिकाणी खेळवली जाईल. क्रिकेटच्या खेळपट्टीवर जेव्हा दोन पॉवरहाऊस टक्कर घेतात तेव्हा मालिका ब्लॉकबस्टर यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.

मास्टरकार्ड, जागतिक मार्की ब्रँड यांची बीसीसीआय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घरच्या सर्व सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजक म्हणून यांची वर्णी लागली होती. त्यांनीच भारतीय महिला क्रिकेट संघाला देखील पाठिंबा जाहीर केला आहे. विश्वविजेते जरी भारतीय मैदानावर आले असले तरी भारतीय महिला संघाला हलक्यात घेऊ नका (#HalkeMeinMattLo) ही मोहीम ऑसीजना एक मोठा आणि स्पष्ट संदेश आहे की त्यांची वेळ आली आहे. ते यापुढे पुशओवर होणार नाहीत आणि मुली मर्यादा पार करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी जे काही लागेल ते करण्यास तयार आहेत.

हेही वाचा: BCCI Selection Committee: जवळजवळ ठरलंच! आयपीएलवर आगपाखड करणारा खेळाडू होणार बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष

चाहत्यांना स्टेडियमच्या दिशेने पहिले पाऊल टाकून महिला क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी कोणतेही विशिष्ट कारण देण्याची गरज नाही. शेवटी, चाहत्यांना मेजवानी देण्यासाठी मेनूमध्ये सर्वकाही आहे. स्मृती मानधना हिचा क्लास शीर्षस्थानी आहे तर तरुण शफाली वर्माच्या लढाईत जाण्यासाठी सज्ज आहे. दीप्ती शर्माची चाल असो किंवा रेणुका सिंगचा वेग असो, या सर्व गोष्टींची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हरमनप्रीत कौरचे नेतृत्व, तिच्या स्फोटक फलंदाजीसह विरोधी पक्षाचा धुव्वा उडवण्यासाठी संपूर्ण संघ सज्ज आहे. जेव्हा चाहत्यांनी वुमेन्स इन ब्लू ला आपला भक्कम पाठिंबा दिला तेव्हाच त्यांची प्रेरणा अनेक पटींनी वाढते. शेवटी, चाहत्यांकडून मिळणारा आनंदच सर्व फरक दाखवून देईल. आता तुम्ही देखील त्यात नक्कीच सहभागी होणार याची खात्री संपूर्ण भारतीय महिला संघाला आहे.