आयपीएल २०२३मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या मॅच टाईममध्ये रविचंद्रन अश्विनचा अंपायर मायकेल गफ यांच्याशी वाद झाला. बंगळुरूच्या डावातील १३व्या षटकात अश्विनने चेंडू हातातून सोडण्यापूर्वी मॅक्सवेल लेगस्टंपच्या बाहेर आला तेव्हा ही घटना घडली. चेंडू हवेत असताना तो पुन्हा पहिल्या मूळ स्थानावर आला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू लेग साईडच्या बाहेर गेला आणि अंपायर गॉफने त्याला ताबडतोब वाईड बॉल असे जाहीर केले. यानंतर अश्विनचा त्याच्याशी वाद झाला.

रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अंपायरशी वाद का झाला हे सांगितले आहे. तो म्हणाला, “मॅक्सीचे दोन्ही पाय लेग साइडच्या बाहेर रुंद रेषेत होते. मी गोलंदाजी करताच तो ऑफ स्टंपच्या दिशेने गेला आणि त्याला वाइड म्हटले गेले असते. पण तो पुन्हा मूळ स्थानावर आला जेव्हा चेंडू माझ्या हातातून सुटला होता. तो चेंडू लेग साईडला मी टाकला होता. कारण की तो लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याअर्थाने तो वाईड बॉल नाही होऊ शकत असे मी अंपायरला सांगितले. जेव्हा मी अंपायर मायकेल गफला विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की ‘हा माझा विवेक आहे’. हे गोलंदाजावर अन्याय आहे.”

हेही वाचा: Geeta Phogat: जंतरमंतर आंदोलनाचा पुढचा अंक, फोगाट दाम्पत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात! गीता ट्वीट करत म्हणते, “ही दुख:द घटना…”

अश्विनने सांगितले काय झाले?

अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा मी धावायला सुरुवात केली तेव्हा तो (मॅक्सवेल) रुंद बाहेरील लेग स्टंपसह लाइनवर होता आणि जेव्हा मी त्याच्या मागे गेलो तेव्हा तो स्टंपवर आला आणि त्याला वाइड म्हटले गेले. मी त्याचा उल्लेखही केला आहे. माझ्या जागी दुसरा कोणताही गोलंदाज असला असता तरी मी हेच म्हटले असते.” अश्विन आणि गफ यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तिसऱ्या अंपायर्सनी रिप्ले पाहिला. त्यातही त्याला वाईड करार देण्यात आले. “वाईड बॉल हे निमित्त आहे. त्यांनी मला विचलित करण्याचा प्रयत्न केला.” असाही अश्विनने पुढे खुलासा करताना सांगितले.

हेही वाचा: IPL 2023 SRH vs KKR: बंगालपुढे हैदराबादी नवाब पडले फिके! कोलकाताचा पाच धावांनी थरारक विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनने वाईड आणि नो बॉलच्या संदर्भात मोठं विधान केले

अश्विनने वाईड आणि नो बॉलच्या संदर्भात मोठं विधान केले. तो म्हणाला, “वाइड नो बॉल इत्यादींचे पुनरावलोकन केले जात आहे, परंतु मला वाटते की अद्याप सुधारणेला वाव असून त्यावर अधिक कडक नियम करणे आवश्यक आहे. अंपायरही त्याची सवय करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.” आयपीएल २०२३ मध्ये, रविचंदन अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत आणि फ्रँचायझीसाठी सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. राजस्थानचा संघ ९ सामन्यांत १० गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.