Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Update: मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या १८ षटकांत २ बाद २०१ धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तथापि, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे चाहते प्रार्थना करतील की, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावा.

आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा प्रवास संपणार आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १६ गुण होतील, तर मुंबई इंडियन्सचेही १६ गुण असतील, मात्र उत्तम नेट रनरेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल.

कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्माने सामना फिरवला –

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स-सनराईजर्स हैदराबाद सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या संघासमोर २०१ धावांचे मोठे लक्ष्य होते, परंतु कॅमेरून ग्रीनशिवाय रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळे संघाने सामना सहज जिंकला. कॅमेरून ग्रीनने ४७ चेंडूत १००० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ८ षटकार मारले. याशिवाय रोहित शर्माने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का एकूण २० धावांवर बसला, जेव्हा सलामीवीर इशान किशन १२ चेंडूत १४ धावा करून भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात १२८ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सचा विजय जवळपास निश्चित केला. यानंतर सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत २५ धावा करत उर्वरित काम पूर्ण केले.

हेही वाचा – MI vs SRH Highlights: कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर मुंबईची हैदराबादवर मात, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पुर्वी विव्रंत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी चमकदार कामगिरी केली. मयंकने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या. विव्रतने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या आहेत. ज्यामुळे हैदराबाद संघाला २०० धावांचा डोंगर उभारता आला होतामुंबईसाठी आकाश मधवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले.