भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशनला संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी शुबमन गिलला संधी देण्यात आली होती. यावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहितच्या या निर्णयाला समर्थने दिले. त्यानंतर सौरव गांगुलीने विराट आणि सचिन तेंडुलकरच्या तुलनेवर मोठे वक्तव्य केले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ११३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. या खेळीसाठी विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एकदिवसीय सामन्यातील विराटचे हे ४५ वे शतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

Hardik Pandya Reaction on Mumbai Indians 5th Loss
MI च्या पाचव्या पराभवावर हार्दिक पंड्यांचं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “पॉवरप्ले मध्ये आमचे..”, नक्की रोख कुणाकडे?
Trupti Khamkar says Diljit Dosanjh is a Shiv bhakt
“दिलजीत दोसांझ शिवभक्त, सतत…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला त्याचा स्वभाव; म्हणाली, “शूटिंग करताना तो तुमच्या…”
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
aai kuthe kay karte fame milind gawali
“संध्याकाळची मालिका दुपारी पाहिली जाईल का?”, ‘आई कुठे काय करते’च्या नव्या वेळेबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले…

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. विराटचे ४५ वे वनडे शतक असल्याने त्याची तुलना सचिनशी केली जात आहे. या वादावर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw: ही आहे पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड? हार्टचा इमोजी टाकत स्टोरी शेअर केल्याने चाहत्यांमध्ये एकच चर्चा

जेव्हा गांगुलीला विराट विरुद्ध सचिन वादावर भाष्य करण्यास विचारण्यात आले, तेव्हा तो पीटीआयला म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण आहे. विराट कोहली महान खेळाडू आहे. त्याने अशा अनेक डाव खेळले आहेत, ४५ शतके अशीच होत नाहीत. ती एक विशेष प्रतिभा आहे.” पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ८७ चेंडूत ११३ धावांची संस्मरणीय खेळी केली.

हेही वाचा – ODI WC Final 2011: ‘२०११च्या फायनलमध्ये धोनीने मला शतक…’, गौतम गंभीरचा मोठा खुलासा

भारताने पहिल्या सामन्यात ७ विकेट गमावून ३७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने ५० षटकांत आठ गडी गमावून ३०६ धावा केल्या होत्या. भारताने पहिला सामना ६७ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.