T20 World Cup Point Table: टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यात आज भारत, पाकिस्तान व बांग्लादेश या तीन शेजाऱ्यांचे महत्त्वाचे सामने होणार आहेत. पाकिस्तानला जर टी २० विश्वचषकात टिकून राहायचं असेल तर आजच्या सामन्यात फक्त स्वतःच्याच नव्हे तर भारत व बांग्लादेशच्या विजयासाठीही त्यांना प्रार्थना करावी लागणार आहे. विश्वचषकात अद्याप एकही सामना न जिंकलेला बाबर आझमचा पाकिस्तान संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे, जर आज पाकिस्तानने नेदरलँडच्या विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला तर अन्य संघांच्या सरसरीत पाकिस्तान टिकू शकतो. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आजच्या तीन सामन्यांचे गणित कसे जुळून येणे गरजेचे आहे जाणून घेऊयात…

३० ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजयी व्हावे लागणार आहे तरच पॉईंट टेबलवर पाकिस्तानला सरासरी गाठता येईल. यानंतर आज संध्याकाळी ४.३० वाजता भारताचा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामना होणार आहे. आज रोहित शर्माच्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा लागेल. आजच्या सामन्यात बांग्लादेशने झिम्बाम्बावेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यापुढे झिम्बाम्बावेचा नेदरलँड समोरही पराभव होणे गरजेचे आहे. यानंतर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पाकिस्तानला पुन्हा मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. आज भारत विजयी ठरल्यास पाकिस्तानला मदत होऊ शकते.

टी २० विश्वचषक पॉईंट टेबल (३० ऑक्टोबर)

दुसऱ्या गटामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. आज झिम्बाबवेचा पराभव करून ४ पॉइंट्ससह बांग्लादेश दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका तीन पॉईंटसह तिसऱ्या स्थानी आहे तर आजच्या सामन्यात पराभूत झालेला झिम्बाबवेचा संघ चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ पाचव्या आणि नेदरलॅण्ड्सचा संघ सहाव्या स्थानी म्हणजे तळाशी आहे. पाकिस्तान आणि नेदरलॅण्ड्सला एकही सामना जिंकता आलेला नाही.

इथेच टीम इंडिया ३६ वर ऑल आउट झाली होती पण.. गावस्करांनी बाबर आझमला धीर देत सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी २० विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने ९ नोव्हेंबरला सुरु होणार आहेत. १३ नोव्हेंबरला टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.