आयपीएलचा यंदाचा हंगाम संपुष्टात आला आहे. आज (२६ मे) चेन्नई येथील चिन्नास्वामी मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना केकेआर विरुद्ध एसआरएच या संघादरम्यान खेळला जाणार आहे. आयपीएलची सांगता होत असतानाच पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची चाहूल लागली आहे. भारतीय संघाच्या अंतिम १५ मधील अनेक खेळाडू पुढील आठवड्यात विश्वचषकासाठी रवाना होणार आहेत. मात्र भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली भारतीय संघाचा भाग असला तरी तो १ जून रोजी होणाऱ्या बांगलादेशविरोधातील सराव सामन्यात खेळू शकणार नाही. याचे कारण त्यानेच स्पष्ट केले आहे.

आयपीएलनंतर हवीये छोटीशी विश्रांती

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही नियोजित वेळेपेक्षा उशीराने रवाना होणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंची पहिली तुकडी शनिवारी (दि. २५ मे) रवाना झाली. तर दुसरी तुकडी सोमवारी रवाना होणार आहे. संजू सॅमसनने दुबईत वैयक्तिक काम असल्याचे कारण देत बीसीसीआयकडून उशीरा युएसएला पोहोचण्याची परवानगी घेतली आहे. तर विराट कोहलीला आयपीएलनंतर छोटीशी विश्रांती हवी आहे. त्यामुळे त्याने उशीरा पोहोचण्याची विनंती केली.

Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
IND vs BAN Indian Cricketer lost his grandmother during match
IND vs BAN सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय खेळाडूवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, तरीही त्याने पार पाडली जबाबदारी
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यासह कोहलीने एकूण १५ सामने खेळले. या सामन्यात त्याने तब्बल ७४१ धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदाही आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

बीसीसीआयने विराट कोहली, सॅमसन आणि हार्दिक पंड्या या तीनही क्रिकेटपटूंची विनंती मान्य केली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, विराट कोहलीने उशीरा सहभागी होण्याबाबत आधीच परवानगी मागितली होती. त्यामुळेच बीसीसीआयने त्याचा व्हिसा उशीराने केला आहे. ३० मे रोजी सकाळी तो न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघेल. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे.

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि मदतनीस कर्मचारी हे शनिवारी रात्री न्यूयॉर्कसाठी निघाले आहेत. ५ जून रोजी भारतीय संघाचा आयर्लंडशी सामना होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारताचा सामना होणार आहे.