Side Effects of Coconut Water: भारतात सर्वत्र नारळ मिळतात. देशात मोठ्या प्रमाणावर लोक नारळ पाण्याचे सेवन करतात. नारळ पाणी फक्त चवीलाच गोड नसते तर त्यामुळे अनेक फायदेही मिळतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. इतकेच नाही तर नारळाच्या पाण्यात ९४ टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळ पाणी घेऊन जातात. पण, नारळ पाण्याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते का? याच प्रश्नाचे उत्तर स्टेडफास्ट न्यूट्रिशनिस्टचे संस्थापक पोषणतज्ज्ञ अमन पुरी यांनी दिले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनी दिले आहे. यासंबंधी सविस्तर जाणून घेऊया..
“उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे फायद्याचे असले तरी, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नारळ पाणी सुरक्षित असले तरी पोषक तत्त्वांनी भरलेले आहे आणि शरीराला हायड्रेट करण्याचा एक उत्तम मार्ग मानले जात असले तरी त्याचे जास्त सेवन काही आरोग्य समस्या निर्माण करू शकते. कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरत असतं”, असे अमन पुरी सांगतात. त्या कोणत्या समस्या आहेत, जाणून घेऊया…
१. रक्तदाब वाढवते
जे लोक उच्च रक्तदाबासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतात त्यांनी नारळपाण्याचे सेवन केल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नारळाचे पाणी प्यायल्याने फायदा होत असला तरी ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच नारळाचे पाणी प्या.
२. अतिसाराची समस्या
जर शरीरात नारळाच्या पाण्याचे प्रमाण जास्त वाढले तर पोटाच्या समस्येने ग्रस्त लोकांना अतिसाराची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत नारळ पाणी कमी प्रमाणात सेवन करणे चांगले.
३. पोटॅशिअमचा स्तर वाढतो
नारळ पाण्यात पोटॅशिअम अधिक प्रमाणात असते. त्याचे सेवन अधिक प्रमाणात केले तर शरीरातील पोटॅशिअमचा स्तर वाढू शकतो.
४. किडनीचा त्रास
नारळ पाण्यात पोटॅशिअम खूप जास्त असते, ज्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच किडनीचा काही त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळाच्या पाण्याचे सेवन करा.
५. डायरियाची समस्या
नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास डायरियाची समस्या होऊ शकते. यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे डायरिया होतो.
६. वजनात वाढ
नारळाच्या पाण्यात कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.